शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

शेकडोंना मिळवून दिले रक्त आणि प्लाझ्मा; कोरोना काळात कल्याणच्या तरुणाचा मित्राच्या मदतीने सुरू आहे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:32 IST

कल्याण : गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरातील किशोर सातपुते या २४ वर्षीय तरुणाने त्याच्या ...

कल्याण : गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरातील किशोर सातपुते या २४ वर्षीय तरुणाने त्याच्या मित्राच्या मदतीने आतापर्यंत ७०० जणांना रक्त मिळवून दिले तर ५०० रुग्णांना प्लाझ्मा डोनर उपलब्ध केले.

मागच्या वर्षी कोरोना काळात लॉकडाऊन लागला. त्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित केले जात नव्हते. त्यामुळे रक्ताची चणचण भासत होती. परिणामी प्लाझ्मा डोनर मिळत नव्हते. सोशल मीडियावर रक्त हवे आहे. प्लाझ्मा डोनर हवा आहे असे मेसेज येत होते. त्यातून किशोरचे मन अस्वस्थ होऊ लागले. त्याचवेळी एक मेसेज सोशल मीडियावर आला की, एका गरोदर महिलेस रक्ताची गरज आहे. मग मित्रांच्या ग्रुपमध्ये हा मेसज फिरला. तिला रक्त उपलब्ध करून देता आले.

राज्यभरातील रक्तदान करू इच्छिणारे आणि प्लाझ्मा डोनरची यादी तयार केली. त्यांचे नंबर मिळविले. हा सगळा डेटा एक्सेल शीटमध्ये तयार केला. या कामात किशोरचा मित्र ऋषी साबळे याची भक्कम साथ मिळाली. ऋषी हा नवी मुंबईत राहणारा. मात्र कोरोनामुळे तो त्याच्या गावी जुन्नरला राहत आहे. गावावरून किशोरच्या सानिध्यात राहून रक्तदान आणि प्लाझ्मा डोनर मिळवून देण्याचे नियोजन पाहत आहे.

किशोरने डोंबिवलीच्या पेंढरकर कॉलेजमध्ये एसवायबीए केले आहे. त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. आईचे नांदिवली परिसरात भाजी विक्रीचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे तेही बंद आहे.  किशोर खासगी कंपनीत कामाला होता. समाजकार्य संभाळून तो नोकरी करीत होता. मात्र जानेवारी महिन्यात त्याच्या आईची प्रकृती बिघडली. तिच्या शरीरातील रक्त कमी झाले. तिला जेवण जात नव्हते. किशोरने तिची कोरोना टेस्ट केली. मात्र टेस्ट निगेटिव्ह आली. किशोरला आईची काळजी घेणे आणि समाजकार्य करणे हा दोन महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या. त्यामुळे त्याने नोकरी सोडली. त्याच्या माउलीनेही मुलाचे चांगले काम पाहून एक वेळचे जेऊ; पण घेतलेल्या चांगल्या कामाचा वसा टाकू नकोस, अशा शब्दांत प्रोत्साहन दिले.

१ मेपासून १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. एकदा लस घेतल्यावर किमान ४५ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुन्हा रक्ताचा तुटवडा भासू शकतो. लसीकरण आवश्यक आहे. ते केलेच पाहिजे. मात्र त्याआधी रक्तदान करा. त्यासाठी रक्तपेढ्यांनीही त्यासाठी २४ तास रक्तपेढी सुरू ठेवावी, असे आवाहन किशोर सातपुते यांनी केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBlood Bankरक्तपेढी