शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

केडीएमसी उपायुक्तांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी फेरीवाल्यांचे उपोषण

By मुरलीधर भवार | Updated: April 25, 2024 16:56 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी कारवाई करताना एका फेरीवाल्यास मारहाण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल या फेरीवाला संघटनेने केला होता.

मुरलीधर भवार, कल्याण:  कल्याण - डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी कारवाई करताना एका फेरीवाल्यास मारहाण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल या फेरीवाला संघटनेने केला होता. उपायुक्त तावडे यांना या प्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करावे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आजपासून पथारी सुरक्षा दलाने उपोषण सुरु केले आहे.

पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी लहू गायकवाड, अमोल केंजळे, सदाभाऊ टाकळकर, मनिषा टाकळकर आदी फेरीवाले उपोषणाला बसले आहेत. फेरीवाला संघटनेच्या शिष्टमंडलाने दुपारी मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेतली. उपायुक्त तावडे यांनी फेरीवाल्यास कारवाई दरम्यान मारहाण केली. त्याच्या विक्री मालाचे नुकसान केले. तावडेंच्या विरोधात निलंबनाची कारवाई करुन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उपायुक्त गुळवे यांच्याकडून फेरीवाला संघटनेच्या शिष्टमंडळाचे समाधान न झाल्याने त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेतलेले नाही. जोपर्यंत तावडे यांच्या विरेधात कारवाई केली जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

१७ एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती. त्याचवेळी त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला हाेता. तो त्याचा चष्मे विक्रीचा स्टा’ल मागे घेतच होता. त्याच वेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी कुरेशी याची गचांडी धरली. त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली. त्याच्या मालाची नासधूस केली. या घटनेनंतर तावडे यांनी त्यांच्याकडून कारवाई दरम्यान कुरेशीला मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhawkersफेरीवाले