शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

‘मी आणि माझे कुटुंब’ इतक्यापुरतेच सरकार मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:16 IST

प्रकाश आंबेडकर : राज्य सरकारवर केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मी आणि माझे कुटुंब इतक्यापुरतेच राज्य सरकार मर्यादित आहे. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित, बाकीच्यांच्या सुरक्षिततेशी सरकारला देणे-घेणे नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर  केली आहे.

आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देणी मिळावीत, या मागणीसाठी २० दिवसांपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आंबेडकर यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. केवळ एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. तू माझे काही काढू नको, मी तुझे काही काढणार नाही, अशी भूमिका तेथे घेतली जात आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. देशात महागाई वाढत आहे. ही महागाई कमी न होता वाढतच जाणार आहे. राज्य सरकारने मूग, तांदूळ, कडधान्ये यांचा सरकारी साठा करून ठेवला असता, तर भाववाढीवर नियंत्रण मिळवता आले असते. साठा केलेले धान्य स्वस्त दराने देता आले असते. मात्र, सरकारने त्या प्रकारचे नियोजन केलेले नाही. सरकारने लॉकडाऊन केले पाहिजे. मात्र, नागरिकांच्या खाण्याची सोय आणि खर्चाला लागणाऱ्या पैशांची सोय करावी. त्यानंतर, खुशाल कितीही दिवस लॉकडाऊन करावे, याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले आहे.समाजवादी आणि शिवसेना ही वेगवेगळी दिसत आहे. हा फरक राहणार आहे. शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचा दावा केला होता. त्यामुळे जेव्हा बाबरी मशिदीचा प्रश्न चर्चेला येईल, तेव्हा समाजवादी आणि शिवसेनेत वेगळेपण दिसून येईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर