शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘मी आणि माझे कुटुंब’ इतक्यापुरतेच सरकार मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:16 IST

प्रकाश आंबेडकर : राज्य सरकारवर केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मी आणि माझे कुटुंब इतक्यापुरतेच राज्य सरकार मर्यादित आहे. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित, बाकीच्यांच्या सुरक्षिततेशी सरकारला देणे-घेणे नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर  केली आहे.

आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देणी मिळावीत, या मागणीसाठी २० दिवसांपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आंबेडकर यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. केवळ एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. तू माझे काही काढू नको, मी तुझे काही काढणार नाही, अशी भूमिका तेथे घेतली जात आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. देशात महागाई वाढत आहे. ही महागाई कमी न होता वाढतच जाणार आहे. राज्य सरकारने मूग, तांदूळ, कडधान्ये यांचा सरकारी साठा करून ठेवला असता, तर भाववाढीवर नियंत्रण मिळवता आले असते. साठा केलेले धान्य स्वस्त दराने देता आले असते. मात्र, सरकारने त्या प्रकारचे नियोजन केलेले नाही. सरकारने लॉकडाऊन केले पाहिजे. मात्र, नागरिकांच्या खाण्याची सोय आणि खर्चाला लागणाऱ्या पैशांची सोय करावी. त्यानंतर, खुशाल कितीही दिवस लॉकडाऊन करावे, याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले आहे.समाजवादी आणि शिवसेना ही वेगवेगळी दिसत आहे. हा फरक राहणार आहे. शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचा दावा केला होता. त्यामुळे जेव्हा बाबरी मशिदीचा प्रश्न चर्चेला येईल, तेव्हा समाजवादी आणि शिवसेनेत वेगळेपण दिसून येईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर