शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कुशिवली धरणाचे काम मार्गी लावा, कल्याणकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 14:07 IST

मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम आणि जागरुक नागरीक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह पत्रकार किरण सोनावणे यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची याबाबत प्रत्यक्ष भेट घेतली

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेस धरणाची आवश्यकता आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी होऊ घातलेल्या कुशिवली धरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. हे काम मार्गी लावण्यात यावे अशी मागणी मी कल्याणकर आणि जागरुक नागरीक मंचाच्यावतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम आणि जागरुक नागरीक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह पत्रकार किरण सोनावणे यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची याबाबत प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना या संदर्भात एक निवेदन सादर करुन त्यांच्यासोबत चर्चा केली. कल्याण डोंबिवली महापालिकेची स्वत:ची पाणी पूरवठा योजना आहे. मात्र महापालिकेच्या मालकीचे धरण नाही. महापालिका आजही उल्हास नदीतून पाणी उचलून त्यावर शुद्धीकरण करते. त्यानंतर नागरिकांची तहान भागविते. तसेच २७ गावे ही पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून आहेत. महापालिकेस पाण्याच्या मंजूर कोटय़ापेक्षा जास्तीचे पाणी उल्हास नदी पात्रतून उचलते. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता पाणी पुरवठा करण्यावर ताण येऊ शकतो. 

महापालिका हददीतील वाढती लोकसंख्या, होणारे नवे बडे गृह प्रकल्प यांचा विचार करता नागरीकांना भविष्यात पाण्याची सोय व्हावी याकरीता धरणाची आवश्यकता आहे अशी मागणी निकम आणि घाणेकर यांनी केली आहे. दरम्यान, चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या जागा या धरणात बाधित होत आहेत. त्यांना योग्य तो मोबदला देऊन तांत्रिक बाबी तपासून कायदेशीर बाबींची पूर्तता करीत धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणcollectorजिल्हाधिकारी