शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हट्टामुळे इच्छुकांच्या पोटात गोळा; ओबीसीच्या आरक्षणामुळे निवडणुक लांबण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:03 IST

कल्याण : केडीएमसीची जाहीर झालेली प्रभाग रचना पाहता लवकरच आरक्षण सोडत होऊन एप्रिल-मेमध्ये निवडणूक होईल असे अंदाज बांधले जात ...

कल्याण: केडीएमसीची जाहीर झालेली प्रभाग रचना पाहता लवकरच आरक्षण सोडत होऊन एप्रिल-मेमध्ये निवडणूक होईल असे अंदाज बांधले जात होते. परंतू, कोरोनापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने कोरोनामुळे लांबलेली निवडणूक होणार तरी कधी? हा संभ्रम आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्यावी ही मागणी लावून धरल्याने ती आणखी लांबणीवर पडणार या चर्चेने इच्छुकांच्या पोटात गोळा उभा राहिला आहे.

केडीएमसीची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते.परंतू,कोरोनामुळे ती अद्याप होऊ शकलेली नाही. नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या मनपात प्रशासकीय राजवट आहे. मार्च-एप्रिल २०२१ मध्ये निवडणूक होण्याचे संकेत होते. परंतू, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती होऊ शकली नाही. लाट ओसरल्यावर निवडणूक होईल,असे बोलले जात होते. परंतू,त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्यातील सर्वच निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण झाला. तो कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरही कायम आहे.

त्रिसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या केडीएमसीच्या निवडणुकीत १३३ नगरसेवक निवडून येतील. आरक्षित जागांचा विचार करता १३३ पैकी १३ प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राहतील तर ४ प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवले जातील. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ६७ प्रभाग हे महिलांसाठी राखीव असतील. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विचार करता ओबीसी प्रवर्गासाठी असलेले ३६ प्रभाग खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. हा आरक्षणाचा तिढा आहेच पण २७ गावांचा मुद्दाही न्यायप्रविष्ठ आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काही जणांनी पक्षांतर केले तर काहीजण तयारीत आहेत.परंतू, निवडणुकीचे बिगुल वाजणार कधी? याबाबतही त्यांच्यातही संभ्रम आहे.

...पण बिगुल काही वाजत नाही

दोन वर्षांत कोरोनाचा लॉकडाऊन असो अथवा प्रादुर्भावात राजकीय,सामाजिक संस्थांकडून नागरिकांना सढळ हस्ते आर्थिक मदत झाली.यात इच्छुक देखील आघाडीवर होते. उत्सवांची वर्गणी,भंडारा, साहित्याची मदत,शक्तीप्रदर्शनाचे नियोजन,सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी,कोरोना लसीकरण,आरोग्य शिबिर असे उपक्रम निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राबविले जात आहेत. यात वारेमाप खर्च होत आहे. पण निवडणुकीचे बिगुल वाजत नसल्याने खर्चाचा भार अजून किती काळ सोसायचा याबाबत इच्छुकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक