शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

राजकीय हट्टामुळे इच्छुकांच्या पोटात गोळा; ओबीसीच्या आरक्षणामुळे निवडणुक लांबण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:03 IST

कल्याण : केडीएमसीची जाहीर झालेली प्रभाग रचना पाहता लवकरच आरक्षण सोडत होऊन एप्रिल-मेमध्ये निवडणूक होईल असे अंदाज बांधले जात ...

कल्याण: केडीएमसीची जाहीर झालेली प्रभाग रचना पाहता लवकरच आरक्षण सोडत होऊन एप्रिल-मेमध्ये निवडणूक होईल असे अंदाज बांधले जात होते. परंतू, कोरोनापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने कोरोनामुळे लांबलेली निवडणूक होणार तरी कधी? हा संभ्रम आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्यावी ही मागणी लावून धरल्याने ती आणखी लांबणीवर पडणार या चर्चेने इच्छुकांच्या पोटात गोळा उभा राहिला आहे.

केडीएमसीची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते.परंतू,कोरोनामुळे ती अद्याप होऊ शकलेली नाही. नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या मनपात प्रशासकीय राजवट आहे. मार्च-एप्रिल २०२१ मध्ये निवडणूक होण्याचे संकेत होते. परंतू, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती होऊ शकली नाही. लाट ओसरल्यावर निवडणूक होईल,असे बोलले जात होते. परंतू,त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्यातील सर्वच निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण झाला. तो कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरही कायम आहे.

त्रिसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या केडीएमसीच्या निवडणुकीत १३३ नगरसेवक निवडून येतील. आरक्षित जागांचा विचार करता १३३ पैकी १३ प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राहतील तर ४ प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवले जातील. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ६७ प्रभाग हे महिलांसाठी राखीव असतील. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विचार करता ओबीसी प्रवर्गासाठी असलेले ३६ प्रभाग खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. हा आरक्षणाचा तिढा आहेच पण २७ गावांचा मुद्दाही न्यायप्रविष्ठ आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काही जणांनी पक्षांतर केले तर काहीजण तयारीत आहेत.परंतू, निवडणुकीचे बिगुल वाजणार कधी? याबाबतही त्यांच्यातही संभ्रम आहे.

...पण बिगुल काही वाजत नाही

दोन वर्षांत कोरोनाचा लॉकडाऊन असो अथवा प्रादुर्भावात राजकीय,सामाजिक संस्थांकडून नागरिकांना सढळ हस्ते आर्थिक मदत झाली.यात इच्छुक देखील आघाडीवर होते. उत्सवांची वर्गणी,भंडारा, साहित्याची मदत,शक्तीप्रदर्शनाचे नियोजन,सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी,कोरोना लसीकरण,आरोग्य शिबिर असे उपक्रम निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राबविले जात आहेत. यात वारेमाप खर्च होत आहे. पण निवडणुकीचे बिगुल वाजत नसल्याने खर्चाचा भार अजून किती काळ सोसायचा याबाबत इच्छुकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक