शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 20:13 IST

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ज्या ठिकाणी गेली अनेक वर्ष कचऱ्याचं साम्राज्य होतं. जिथं चुकूनही कुणी फिरकायचं नाही आता त्याठिकाणी पालिका सुंदर उद्यानाची निर्मिती करणार आहे. 

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड केवळ बंद केल्याची घोषणा कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेली नाही. तर त्याठिकाणी येत्या काळात सुंदर असं गार्डन तयार केलं जाणार असल्याची माहिती खुद्द पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. काल २५ मेपासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड कायमस्वरुपी बंद करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आज विजय सूर्यवंशी यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी ऑगस्टीन घुटे, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे उपस्थित होते. 

"आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद झालं ही खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. आता या जागेवरील सगळा कचरा बायोमायनिंग पद्धतीने हटविला जाईल. या जागेवर उद्यान, सायकलिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केला जाणार आहे", अशी घोषणा सूर्यवंशी यांनी केली. यासोबतच परिसरात बिल्डींग परवानगी देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अटी त्यामध्ये अंतर्भूत असतात, परंतु या अटी पालन न केल्यास संबंधित विकासकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देखील केडीएमसी आयुक्तांनी यावेळी दिला. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद केल्यामुळे उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया करण्यात येईल . यापूर्वी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नव्हते,आता ओला कचरा हा आता बायोगॅस  व कंपोस्टिंग साठी पाठवला जातो आणि सुका कचरा उचलण्यासाठी या एजन्सी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचेकडून महानगरपालिकला रॉयल्टी देखील मिळते अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका