शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या एपीएमसी फूल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री

By सचिन सागरे | Updated: April 9, 2024 17:54 IST

एपीएमसी फुल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री झाल्याची माहिती एपीएमसी मार्केट इन्चार्ज निवृत्ती चकोर यांनी दिली.

कल्याण : गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. गुढीपाडव्याला होणारी मागणी लक्षात घेऊन केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली. असे असले तरी, पिवळ्या झेंडूपेक्षा महाग असलेल्या केशरी झेंडूला सर्वात जास्त मागणी होती. एपीएमसी फुल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री झाल्याची माहिती एपीएमसी मार्केट इन्चार्ज निवृत्ती चकोर यांनी दिली.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या फुल मार्केटमध्ये संध्याकाळी ६ वाजल्यापासून फुलांची आवक सुरू होते. पहाटे ३ वाजल्यापासून घाऊक विक्रेते याठिकाणी फुलांच्या खरेदीसाठी गर्दी करतात. सण, समारंभाच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. पाडव्याच्या निमित्ताने गेल्या चार दिवसांपासून फुलांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती. शनिवारी मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढल्याने दर देखील वाढले. हीच संधी साधत व्यापाऱ्यांनी रविवारी झेंडूच्या फुलांची जास्त आवक केली. यामुळे, फुलांचे दर देखील काही प्रमाणात कमी झाले. या दोन दिवशी अनेकांना सुट्टी असल्याने दोन दिवस आधीच फुलांची खरेदी करण्यात आली. यामुळे, सोमवार आणि पाडव्याच्या दिवशी मार्केटमध्ये फुलांची मागणी म्हणावी तशी झाली नसल्याने फुलांचे दरही कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढत असल्याने, शेतकरी मागणीनुसार फुलांचा पुरवठा करीत असतात. अनेक दिवस राखून ठेवलेली फुले सणाच्या निमित्ताने बाजारात पाठवली जातात. ज्या ठिकाणी मालाला किमत असते मार्केटला व्यापारी प्राधान्य देत असतात. त्यामुळे, शनिवारी फुलांच्या दरात वाढ झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी एपीएमसी मार्केटकडे धाव घेतली. त्यामुळे फुलांची आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :FlowerफुलंMarketबाजारkalyanकल्याण