शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शिरलेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी, शिवसेना माजी नगरसेवकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 17:49 IST

Kalyan: नुकसानग्रस्त घराचे तहसील कार्यालयाने पंचनामे करुन त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई स्वरुपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी असलेल्या सखल भागातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त घराचे तहसील कार्यालयाने पंचनामे करुन त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई स्वरुपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.     नदी व खाडी किनारी असलेल्या डोंबिवली खाडी परिसर, मोठा गाव ठाकूर्ली, कोपर परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधूनी नजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासगर, वालधूनी, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, वीजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले आले. 

आधीच कोरोनामुळे मेटाकूटीला आलेले नागरीकांचे घर संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावे. सव्रेक्षण करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी पावसामुळे घरांचे नुकसान झले असले तरी यापूढेही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्या येत आहे. मात्र येत्या सोमवारपासून पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत.

कल्याण डोंबिवली शहराला 2019 साली अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला होता. त्यावेळी तहसील कार्यालयातर्फे पंचनामे करण्यात आाली होते. मात्र नुकसानग्रस्त घरांपैकी केवळ 30 टक्के लोकांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती. उर्वरीत 70 टक्के नागरीकांना नुकसान भरपाई मिळालीच नाही. ही नुकसान भरपाईची रक्कम आणि आत्ता झालेल्या नुकसानीची रक्कम दिली जावी याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस