शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाणी शिरलेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी, शिवसेना माजी नगरसेवकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 17:49 IST

Kalyan: नुकसानग्रस्त घराचे तहसील कार्यालयाने पंचनामे करुन त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई स्वरुपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी असलेल्या सखल भागातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त घराचे तहसील कार्यालयाने पंचनामे करुन त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई स्वरुपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.     नदी व खाडी किनारी असलेल्या डोंबिवली खाडी परिसर, मोठा गाव ठाकूर्ली, कोपर परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधूनी नजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासगर, वालधूनी, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, वीजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले आले. 

आधीच कोरोनामुळे मेटाकूटीला आलेले नागरीकांचे घर संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावे. सव्रेक्षण करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी पावसामुळे घरांचे नुकसान झले असले तरी यापूढेही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्या येत आहे. मात्र येत्या सोमवारपासून पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत.

कल्याण डोंबिवली शहराला 2019 साली अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला होता. त्यावेळी तहसील कार्यालयातर्फे पंचनामे करण्यात आाली होते. मात्र नुकसानग्रस्त घरांपैकी केवळ 30 टक्के लोकांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती. उर्वरीत 70 टक्के नागरीकांना नुकसान भरपाई मिळालीच नाही. ही नुकसान भरपाईची रक्कम आणि आत्ता झालेल्या नुकसानीची रक्कम दिली जावी याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस