शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन; भाजपाचा इशारा

By अनिकेत घमंडी | Updated: November 24, 2022 16:17 IST

पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रारकेली आहे.

 डोंबिवली: २७ गावात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले असून दिवाळी दरम्यान केवळ कागदावर पाणी वाढले पण प्रत्यक्षात मात्र नेत्यांच्या अन नागरिकांच्या तोंडचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पळवले असल्याची टीका भाजप डोंबिवली ग्रामीण पदाधिकारी नंदू परब यांनी।केली. पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीतर मात्र एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिली.

कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपने २७ गावात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बद्दल एमआयडीसी अधिकार्यांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या. पाणी नाही म्हणून नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेला आहे त्याची जाण ठेवा, जे सुरू आहे ते योग्य नाही, राजकारण पाण्याचे करू नका असे मत माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर म्हणाले. नागरिकांना पाणी ही मूलभुत गरज असून ते द्यायलाच हवे असेही ते म्हणाले. मनपाने कर भरला नाही भरला ही काहीही तांत्रिक कारण सांगू नका, असेही ते म्हणाले.

पाणी हक्क असून तो सगळ्याना मिळायला हवा , पाऊस भरपूर झाला आहे, धरण भरलेली आहेत, जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता सर्वत्र पाणी मिळते असे असताना २७ गाव पाण्यापासून वंचित ठेवू नका असे मत भाजपचे पदाधिकारी अमर माळी यांनी व्यक्त।केले. महिलांच्या समस्या जाणून घ्या, जरा गावागावात फिरा, एसी दालनात बसून त्या समस्या सुटणार नाहीत, कळणार नाहीत. आबालवृद्ध नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत, जरा डोकं ठिकाणावर ठेवून प्रामाणिक काम करा, इथे यायच म्हंटल तरी बंधन असतात, नागरिकांसाठी कार्यालय बनवलं असून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थाम्बवा अन्यथा आंदोलन करावेच लागेल असा इशारा महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे यांनी दिला.

नागरिक शांत आहेत याचा फायदा घेऊ नका, कळशी हंडा आंदोलन केले ना तर मात्र त्याला अधिकारी जबाबदार असतील असेही सगळ्यानी स्पष्ट केले. पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रार।केली आहे. पाणी नाही, रस्ते नाही, कचऱ्याची समस्या आहेच मग या ठिकाणी मिळते काय? केवळ धूळधाण का असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना।केला. पीएमओला पत्र, तक्रार पाठवून काही फरक पडतो का ते बघायचे असा सवाल त्यांनी केला. त्या परिसरात आठवडा भरापासून पाण्याची समस्या वाढली असून मनपाकडे तक्रारी करून हैराण झाल्याने पीएमओ कार्यालयाकडे दाद मगितल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका