शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन; भाजपाचा इशारा

By अनिकेत घमंडी | Updated: November 24, 2022 16:17 IST

पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रारकेली आहे.

 डोंबिवली: २७ गावात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले असून दिवाळी दरम्यान केवळ कागदावर पाणी वाढले पण प्रत्यक्षात मात्र नेत्यांच्या अन नागरिकांच्या तोंडचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पळवले असल्याची टीका भाजप डोंबिवली ग्रामीण पदाधिकारी नंदू परब यांनी।केली. पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीतर मात्र एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिली.

कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपने २७ गावात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बद्दल एमआयडीसी अधिकार्यांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या. पाणी नाही म्हणून नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेला आहे त्याची जाण ठेवा, जे सुरू आहे ते योग्य नाही, राजकारण पाण्याचे करू नका असे मत माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर म्हणाले. नागरिकांना पाणी ही मूलभुत गरज असून ते द्यायलाच हवे असेही ते म्हणाले. मनपाने कर भरला नाही भरला ही काहीही तांत्रिक कारण सांगू नका, असेही ते म्हणाले.

पाणी हक्क असून तो सगळ्याना मिळायला हवा , पाऊस भरपूर झाला आहे, धरण भरलेली आहेत, जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता सर्वत्र पाणी मिळते असे असताना २७ गाव पाण्यापासून वंचित ठेवू नका असे मत भाजपचे पदाधिकारी अमर माळी यांनी व्यक्त।केले. महिलांच्या समस्या जाणून घ्या, जरा गावागावात फिरा, एसी दालनात बसून त्या समस्या सुटणार नाहीत, कळणार नाहीत. आबालवृद्ध नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत, जरा डोकं ठिकाणावर ठेवून प्रामाणिक काम करा, इथे यायच म्हंटल तरी बंधन असतात, नागरिकांसाठी कार्यालय बनवलं असून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थाम्बवा अन्यथा आंदोलन करावेच लागेल असा इशारा महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे यांनी दिला.

नागरिक शांत आहेत याचा फायदा घेऊ नका, कळशी हंडा आंदोलन केले ना तर मात्र त्याला अधिकारी जबाबदार असतील असेही सगळ्यानी स्पष्ट केले. पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रार।केली आहे. पाणी नाही, रस्ते नाही, कचऱ्याची समस्या आहेच मग या ठिकाणी मिळते काय? केवळ धूळधाण का असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना।केला. पीएमओला पत्र, तक्रार पाठवून काही फरक पडतो का ते बघायचे असा सवाल त्यांनी केला. त्या परिसरात आठवडा भरापासून पाण्याची समस्या वाढली असून मनपाकडे तक्रारी करून हैराण झाल्याने पीएमओ कार्यालयाकडे दाद मगितल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका