शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कल्याणच्या नेतिवली टेकडीवरील पाच घरे कोसळली

By मुरलीधर भवार | Updated: July 18, 2024 17:55 IST

गेल्या आठवडाभरात सुरु असलेल्या पावसामुळे टेकडीवरील माती पावसामुळे खचत आहे.

मुरलीधर भवार- कल्याण-शहराच्या पूर्व भागातील नेतिवली टेकडीवरील पाच घरे कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत जिवीत हानी झालेली नाही. टेकडीवरील तीन घरे दोन घरांवर कोसळली. गेल्या आठवडाभरात सुरु असलेल्या पावसामुळे टेकडीवरील माती पावसामुळे खचत आहे. त्याचाच परिमाण म्हणून टेकडीवरील पाच घरे कोसळल्याची घटना घडली आहे.

या टेकडीवर राहणारे रहिवासी अनंत पवार यांच्या घरांना तडे गेले होते. तडे गेलेल्या भिंती कोसळल्या. टेकडीवरील उताराला असलेल्या तीन घरांच्या खाली असलेल्या दोन घरांवर ही घरे कोसळली. ज्या घरांवर ही तीन घरे कोसळी. त्या दोन घरांपैकी एका घरात एक महिला होती. ती किरकाेळ जखमी झाली आहे. कोसळलेल्या अन्य चार घरांमध्ये कोणीही नव्हते. घराती मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे ती बचावली आहेत. तीन दिवसापूर्वी पावसामुळे कचोरे टेकडीचा काही भाग कोसळून भला मोठा दगड घरंगळत टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या घराजवळ येऊन थबकला होता. त्याठिकाणीही जिवीत हानी झालेली नव्हती.

मात्र कचोरे, नेतिवली या टेकडी परिसरातील १४० नागरीकांना घरे खाली करण्याच्या नाेटिसा महापालिका प्रशासनाकडून यापूर्वीच बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्या राहण्याची पर्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळेत केली आहे. पावसाचा जाेर जास्त झाला की, काही लोक तात्पुर्तया स्वरुपात त्याठिकाणी काही वेळेपूरते जातात. पावसाचा जोर आेसरला की, पुन्हा टेकडीवरील घरांमध्येच जाऊन राहतात. त्यांनी पावसाळयात टेकडीवरील घरे सोडावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले असले तरी त्याला नागरीकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. नागरीक जीव मुठीत घेऊनच टेकडीवरील घरात राहणे पंसत करतात. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या आणि घरे पडण्याच्या घटना घडत असल्याने टेकडीवर राहणाऱ््या रहिवासीयांच्या जिवीतास धोका संभवतो. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याण