शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

डोंबिवलीत गोळवली परिसरात 40 वर्षांत पहिल्यांदा शिरले अनेक घरांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 16:01 IST

एमएसआरडीसीने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील नालेसफाईकडे केले दुर्लक्ष

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शीळ फाटा रोडवरील मानपाडा पोलीस स्टेशन, गोळवली गाव या परिसरात मुसळधार पावसाने पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे. विशेषतः 109 प्रभागातील गोळवली गाव परिसरात गेल्या 40 वर्षांत कधी साचले नाही, असे पाणी रविवारपासून साचले आहे.

कल्याण शीळ फाटा रस्त्याचे काम एमएसआरडीसीने केले आहे. मात्र रस्त्याचे काम करताना एमएसआरडीसीने पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या लहान मोठ्या मोऱ्या बुजविल्या. काही नालेही बुजविले गेले. याबाबत एमएसआरडीसीकडे वारंवार तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र त्याची संबंधित मंत्रालयाने दखल घेतली नाही, अशी माहिती प्रभाग क्रमांक 109 गोळवली वॉर्डचे भाजपचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी लोकमतला दिली.  या चार गावांतील पाणी जाण्यासाठी एमएसआरडीसीने रस्ता बांधताना काळजी घेतली नाही, असेही पाटील यांनी सांगितले. नगरसेवक म्हणून मी वारंवार पाठपुरावा करत आहे, असे ते म्हणाले. मात्र अधिकारी दाद देत नाहीत, असे ते म्हणाले. 

गोळवली गावाजवळ कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यात काल पावसाचे पाणी शिरले होते, असेही पाटील म्हणाले. या भागात 40 वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील नाल्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी पाटील यांनी केली अाहे.

टॅग्स :Rainपाऊसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण