शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महापारेषणच्या २२० KV जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

By अनिकेत घमंडी | Updated: May 6, 2024 14:51 IST

वडवली आणि आंबेशिव उच्चदाब वाहिन्यांमधून वीजुपरवठ्याला सुरुवात 

डोंबिवली: महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा ४ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. यात ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाला असून वडवली व आंबेशिव या दोन २२ केव्ही उच्चदाब वाहिन्यांमधून सुरळीतपणे वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले.

परिणामी महापारेषणच्या १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रपमधील ग्राहकांना दिलासा मिळाल्याचा दावा महावितरणने केला. जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर शनिवारी कार्यान्वित करण्यात आला. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी वडवली आणि आंबेशिव या उच्चदाब वीजवाहिन्यांही शनिवारीच कार्यान्वित करण्यात आल्या.

या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्राचा भार जवळपास २५० अँपियरने कमी झाला. त्यामुळे वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची मागणी वाढल्यानंतर १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी करण्याची महापारेषणकडून होणारी मागणी संपुष्टात आली आहे. मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी झाल्यामुळे विजेच्या अधिक मागणीच्या कालावधीत बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रप परिसरातील ग्राहकांचा बाधित होणारा वीजपुरवठा यापुढे सुरळीतपणे सुरू राहणार आहे. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी महापारेषणकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा विजेची मागणी वाढलेल्या कालावधीत कार्यान्वित होऊ शकला. यात महापारेषणकडून मिळालेले सहकार्य महत्वाचे आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण