शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

अखेर झोपी गेलेले जागे झाले! पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर कारवाई

By प्रशांत माने | Updated: March 15, 2023 17:13 IST

काही दिवसांपासून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती.

डोंबिवली: एरव्ही पाणी चोरीकडे दुर्लक्ष करणारे केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री टाकलेल्या धाडीनंतर खडबडुन जागे झाले असून पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरसह अनधिकृत कनेक्शन प्रकरणी एकाच्या विरोधात यंत्रणांकडून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपासून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती. त्याची दखल घेत सामंत यांनी अचानक मध्यरात्री डोंबिवली ग्रामीण परिसरात धाड टाकत टँकर माफीयांच्या वतीने सुरु असलेल्या पाणी चोरीचा पर्दाफाश केला होता. दरम्यान केडीएमसीच्या अधिका-यांनी त्याठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यातून महापालिकेच्या कनेक्शनवरून कोणताही अनधिकृत टँकर किंवा पाणीपुरवठा होत नाही असा दावा केला आहे. यावरून मंत्री सामंत यांनी टाकलेली धाड फोल ठरली का अशी  चर्चा रंगली असली तरी मंत्र्यांनी टाकलेल्या अचानक धाडीने  झोपी गेलेल्या सरकारी यंत्रणांना अखेर जाग आल्याचे पाणीचोरी प्रकरणी दाखल केलेल्या गुन्हयांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. पाणी चोरणा-या तब्बल १२ सर्व्हिस सेंटर चालविणा-यांवरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत.बदलापूर-पाईप लाईन रोडवरील खोणी, कोळेगाव, रूक्मिणीनगर, हेदुटणे, धामटण या परिसरात ही कारवाई करण्यात आली. डोंबिवली एमआयडीसी येथील कंपन्यांना, केडीएमसी अंतर्गत येणारी २७ गावे आणि इतर गृहसंकुले यांना पाणी पुरवठा करणा-या तीन मुख्य जलवाहीन्यांना टॅपिंग मारून सर्व्हिस सेंटर चालक पाणी चोरून वापरत असल्याचे कारवाईत उघड झाले. तर ई प्रभाग क्षेत्र परिक्षेत्रातील संदप रोड परिसरात अनधिकृत रित्या कनेक्शन घेऊन पाणी चोरी करणा-याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीUday Samantउदय सामंत