शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पंधरा डब्यांची लोकल कागदावरच; प्रस्ताव पडूनच, आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण सुरू

By अनिकेत घमंडी | Updated: June 27, 2024 10:29 IST

टिटवाळा व बदलापूर येथून १५ डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्षे कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जात आहे.

 अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: गर्दीने ओसंडून वाहणारी आणि अस्वच्छतेने बरबटलेली रेल्वे स्थानके, स्वच्छतागृह नावाचे उकिरडे, दरवाजात लटकलेले प्रवासी असा प्रचंड शारीरिक वेदना आणि भयंकर मनस्ताप देणारा प्रवास नाईलाज म्हणून ठाणे जिल्ह्यातील २१ लाख चाकरमानी दररोज करतात. गर्दीत हात सुटला तर मृत्यूला कवटाळतात. टिटवाळा व बदलापूर येथून १५ डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्षे कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जात आहे. कधीही लोकल वेळेवर चालवल्या जात नाहीत, सदानकदा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली असते. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हानसगर, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा, आसनगाव, कसारा, शहाड, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे या स्थानकांमधील प्रवाशांपैकी कुणी ना कुणी रेल्वेतून पडून होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. सहप्रवासी क्षणिक दुःख व्यक्त करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. घरातून सकाळी निघालेला माणूस पुन्हा घरी येईल याची शाश्वती नसते. किंबहुना तशी मानसिक तयारी करुन रेल्वेचा प्रवास करावा लागतो. वर्षानुवर्षे असेच सुरू आहे.

९४ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यूलोहमार्ग पोलिसांकडील माहितीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत मध्य रेल्वेच्या लोकल  मधून गर्दीमुळे पडून ९४ हून अधिक प्रवासी मरण पावले. अनेक जणांना अपंगत्व आले. 

प्रकल्प अडकला ?लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान एक ते दोन प्रवाशांचा मृत्यू होतो. काहींना कायमचे अपंगत्व येते. प्रवासी वहन क्षमता तत्काळ वाढविण्यासाठी १५ डबा लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे.

मागील दहा वर्षांत एकही लोकल रेल्वेच्या ताफ्यात आलेली नाही. त्यामुळेच ठाणे व कल्याणवरून कर्जत व कसाऱ्यासाठी एकही लोकल वाढलेली नाही. गर्दीच्या विभाजन नियंत्रणाचे कोणतेही नियोजन न करता एसी लोकल लादण्याचा रेल्वेच्या कमिशन बाज अधिकाऱ्यांचा डाव आहे. बदलापूर व टिटवाळा येथून १५ डबा लोकल चालविण्याचा प्रकल्प मुद्दाम प्रलंबित ठेवला आहे. - मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

४२५ कोटी रुपयांचा प्रकल्प सहा वर्षे कागदावर- पाचवा, सहावा मार्ग शोभेचा ठरला असून कोट्यवधी रुपये वाया गेले. कल्याण ते मुंबई १५ डब्यांची लोकल सुरू केल्यानंतरही वाढणारी गर्दी व नियमित होणारे अपघात पाहून टर्मिनल स्थानके असलेल्या बदलापूर व टिटवाळा येथील सर्व लोकल १५ डब्यांच्या कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे बोर्डाकडे केली. - रेल्वे प्रशासनाने यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवून सहा वर्षे झाली. मात्र अजून त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही. - ४२५ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पात शहाड, आंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांची लांबी वाढवणे, सिग्नल यंत्रणा बदलणे या प्रमुख कामांसह अन्य प्रवासी सुविधांचा समावेश आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे