शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

‘पैसा महत्त्वाचा झाल्यानेच शेतकरी कर्जबाजारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 08:07 IST

दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पैसा ही एक व्यवस्था आहे ती आवश्यक असली तरी ती कृत्रिम आहे. पैसा खाऊन पोट भरले जात नाही, त्यासाठी अन्नच खावे लागते. या सर्व व्यवस्थेत माध्यम म्हणून पैशांचा उपयोग आहे. मात्र, हल्लीच्या आधुनिक जगात पैसा महत्त्वाचा होत असून, वस्तूचे महत्त्व घटत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी अन्न पिकविणारा शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत अप्रत्यक्षपणे तीव्र नाराजी व्यक्त केली.

दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते. बँकेच्या ‘सुवर्णबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी उपस्थित होते. 

कल्याण बँकेचे अभिनंदनजगातील दु:ख, दारिद्र्य आणि शोषण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आर्थिक जगातील कार्यकर्त्यांना कार्य करावे लागणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागात असलेल्या छोट्या-छोट्या लोकांना पैशांची गरज असते. या लहान-लहान काम करणाऱ्या लोकांच्या आर्थिक दुबळेपणाचे निवारण करणे या मूळ उद्देशानेच महाराष्ट्रात सहकारी बँकांना सुरुवात झाली आणि लहान-लहान लोकांच्या मनामध्ये परमेश्वर जागरूक असून, त्यामुळे कर्ज बुडवायचाही विचार करत नाही, तो वेळेवर कर्जाची परतफेड करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्याण जनता बँकेचे भागवत यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत