शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल होऊन देखील टोलवसूली सुरुच

By मुरलीधर भवार | Updated: October 10, 2023 23:22 IST

टोल वसूली प्नकरणी नव्याने याचिका दाखल करणार, याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांची माहिती

मुरलीधर भवार, कल्याण-मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई एंन्ट्री पा’ईंटच्या टोल नाक्यातून कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल झालेली असताना टोल वसूली केली जात आहे. त्याचा सरकारला काही फायदा होत नसून कंत्राटदाराची तिजोरी भरली जात आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यानी दिली आहे.

घाणेकर यांनी सांगितले की, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर देखभाल दुरुस्तीसह ४ हजार ८०० काेटी रुपये खर्च झाला आहे. २०२३ पर्यंत २२ हजार कोटी रुपये वसूल झाले आहेत. टोल वसूलीची रक्कम वसूल होऊन देखील या रस्त्यावर २०३५ सालापर्यंत टोलवसूली केली जाणार आहे. या प्रकल्पाची आधारभूत रक्कम ३ हजार २०० कोटी रुपये राज्य सरकारला मिळणे अपेक्षित होते. मात्र आत्तापर्यंत सरकारच्या तिजोरीत केवळ ९१८ कोटी रुपये जमा झालेले आहे.

तसेच मुंबई एन्ट्री पा’ईंटवर देखभाल दुरुस्तीवर १ हजार ५१६ कोटी रुपये खर्च झाला आहे. या खर्चाच्या तिप्पट टोलवसूली करण्यात आली आहे. आत्तापर्यंत टोलवसूलीची रक्कम ४ हजार ५०० कोटी रुपये आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई एन्ट्री पा’ईटवरील टोल नाक्यावरून किती वसूली झाली याची नेमकी रक्कम आणि आकडेवारी अद्याप पुरविण्यात आलेली नाही. आयआरबीकडून राज्य रस्ते विकास महामंडळाने ४२७ कोटी रुपये वसूल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३८९ कोटी रुपये भरले आहेत. २ हजार १०० कोटी रुपये एमईपी कंपनीने राज्य रस्ते विकास महामंडळास दिले आहे. या व्यतिरिक्त २०२७ पर्यत ११ हजार ८४० काेटी रुपये वसूल कारयेच आहेत. चार वर्षापूर्वी टोल वसूली झाली आहे. तरी देखील मुंबई एन्ट्री पा’ईंटवरील टोल नाक्यावर २०२७ सालापर्यंत टोल भरावा लागणार आहे. या शिवाय दर चार वर्षांनी टोल दरवाढ होणार आहे. जास्तीचा टोल भरावा लागणार आहे. २०१९ साली कंत्राट संपले असता त्याला मुदतवाढ २०१४ सालीच देण्यात आली आहे. हा अजब मुदतवाढीचा प्रकार देखील समोर आला आहे. या प्रकरणी सरकारचा महसूल बुडाला आहे. सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होत नसल्याने या प्रकरणात नव्याने याचिका दाखल केली जाणार आहे असे घाणेकर यांनी सांगितले.

मुंबईमध्ये प्रवास करणाऱ््या पंरतू कोणताही टोलनाका न आेलांडणाऱ््या वाहनांच्या प्रत्येक लिटर पेट्राेलवर १ टक्के आणि डिझेलवर ३ टक्के उपकर आकारला जातो. ठाणे जिल्ह्यातील काही भाग पूर्ण नवी मुंबई आणि पालकघऱ् जिल्ह्यातील काही भाग दुहेरी पैसे सरकारला भरतात.त्याचबरोबर ४०० कोटी पेक्षा अधिकच्या खर्चाच्या प्रकल्पाकरीता सरकार वेगळे धाेरण जाहिर करेल असे २००९ मध्ये जाहिर केले हाेते. २०२३ पर्यंत असे कोणतेही धोरण जाहिर केलेले नाही. त्यामुळे सरकारचे धाेरण हे टोल कंत्राटदार धार्जिणे असल्याचा आरोप घाणेकर यांनी केला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाका