शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

तब्बल ८ कोटींची कार वापरणाऱ्या उद्योगपतीवर विजचोरीचा आरोप; ३४ हजार थकवल्यानं तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:36 IST

कल्याणातील प्रसिद्ध उद्योगजकांवर ३४ हजार रक्कमेच्या विजचोरीचा आरोप, एमएससीबीने केली पोलीस ठाण्यात तक्रार 

कल्याण: एकीकडे कोरोना काळात सामान्य नागरिक महावितरणाने दिलेली बिलं मोठ्या मुश्किलीने भरत असताना कल्याणमध्ये एक वेगळा प्रकार समोर आल्यान लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याणमधील प्रसिद्ध उद्योगपती तथा गौरी विनायक डेव्हलपर्सचे मालक संजय गायकवाड यांच्यावर ३४ हजार रुपयांच्या विजचोरीचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांच्याकडे ८ कोटींची रॉल्स रॉईस कार आहे. या कारमुळे ते चर्चेतही आले होते. त्यामुळे ८ कोटींची कार घेणाऱ्या उद्योगपतीला ३४ हजारांचं बिल भरता येत नाही का, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

महावितरणाने याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला. मात्र वीजचोरीचा आरोप गायकवाड यांनी फेटाळला आहे. हा माझी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याच त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान नंतर  संबंधित रक्कम गायकवाड  यांनी भरली असल्याचे सांगत हा गुन्हा मागे घेण्याची विनंती महावितरणाने केली आहे. गायकवाड एका राजकीय पक्षाच्या जवळचे मानले जातात.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंधे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले. मार्च-२०२१ मध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रितसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व १५ हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणाऱ्या संजय अनंत गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता बुंधे यांच्या वतीने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीजचोरीची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार ३० जून रोजी गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व तडजोडीची १५ हजार रुपयांची रक्कम सोमवारी १२ जुलै रोजी महावितरणकडे भरल्याचं  महावितरणकडून सांगण्यात आलय. 

संजय गायकवाड यांनी मात्र वीजचोरीचा आरोप फेटाळून लावलाय. वीजचोरी करत असतो, तर महावितरणाने वीज खंडित का केली नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ही वीज चोरी नसून तडजोडीचे बिल आहे. मीटरचा एक फेज जळाला होता. त्यामुळे दुसरा फेज बायपास असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तडजोडी अंती ३४ हजार भरायला सांगितले होते ते भरण्यात ही आले आहेत. तरीसुद्धा या तांत्रिक मुद्द्याला चोरीचा रंग देणे हे आपल्यावर अन्याय करणारे असून या प्रकारात आपली प्रतीमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला असल्याचा दावाही  गायकवाड यांनी केला. 

टॅग्स :electricityवीज