शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

एमआयडीसीत केबल नादुरुस्त झाल्यामुळे बारा तास वीज पुरवठा बंद

By अनिकेत घमंडी | Updated: April 20, 2024 20:15 IST

वारंवार वीज जात असल्याने येथील जनता मेटाकुटीला आली आहे.

 डोंबिवली : येथील एमआयडीसी निवासी भागात एका हॉस्पिटल रस्त्यावरील काही इमारती आणि बंगल्यात शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून वीज पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून महावितरण कर्मचारी नादुरुस्त केबल दुरुस्त करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असून, बारा तासांनी सहा वाजता वीजपुरवठा चालू करण्यात आला. भयंकर उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यात असे वारंवार वीज जात असल्याने येथील जनता मेटाकुटीला आली आहे.

 शुक्रवारी निवासी भागात रात्री साडे दहा नंतर मध्यरात्री पर्यंत वीज पुरवठा जात येत होता. त्यात आज एमआयडीसी कडून होणारा पाणी पुरवठा काल शुक्रवार पासून जो एक दिवसासाठी बंद होता तो पाणी पुरवठा दुरुस्ती अभावी शनिवारी दुपारी तीन वाजता सुरू झाल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले. केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण निवासी भागात वाढत असून काही दिवसापूर्वी मिलापनगर मध्ये तेरा तास वीज पुरवठा याच कारणासाठी बंद होता. काँक्रिट रस्ता, सांडपाणी वाहिन्या, गटारे इत्यादी कामामुळे महावितरणच्या भूमिगत केबलला धक्का लागल्याने केबल नादुरुस्त होत असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. आगामी पावसाळ्यात केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे नलावडे म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याण