शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
2
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
3
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
4
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
5
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
6
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
7
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
8
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
9
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
10
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
11
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
12
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
13
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
14
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
15
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
16
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
17
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
18
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
19
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द

By अनिकेत घमंडी | Updated: June 19, 2024 14:55 IST

विद्यानिकेतन शाळेचे दुपारचे सत्र करावे लागले रद्द ट्रॅफिक, आरटीओ, महापालिका यंत्रणा ढिम्म

डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोेंडी होते. याचा नाहक त्रास नागरीकाना सहन करावा लागतो. या वाहतूक काेंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक काेंडीमुळे बुधवारी सकाळच्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी बस वेळेवर परत न आल्याने शाळेने दुपारचे सत्र ५वी ते ८ वीचे वर्ग बंद करावे लागले. लोकमतने यासंदर्भात शाळा सुरू होण्यापूर्वीच वृत्त देऊन संबंधित यंत्रणांना अवगत केले होते, मात्र तरीही वाहतूक नियंत्रण विभाग, आरटीओ, महापालिका, एमएसआरडीसी या यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचा फटका विदयार्थ्यांना बसला. कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे. या कामामुळे वाहन चालक, स्थानिक नागरीक, रुग्णवाहिका आणि शालेय बसला फटका सहन करावा लगत आहे. वाहतूक विभागाच्या शून्य नियोजनामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. कधी कधी अर्धा तासाच्या प्रवासाला एक ते दोन तास लागतात. या बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला होता.

मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते सुरु करावा. अवजड वाहतूक अन्य रस्त्याने वळवा अशी मागणी केली होती. या मागणी दखल प्रशासनाने घेतलेली नाही. प्रशासन अद्याप जागे झालेले नाही. आत्ता तर कल्याण शीळ रस्त्याला लागून असलेल्या विद्या निकेतन शाळेला बुधवारी वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. ही शाळा तीन सत्रात चालते. एक आठ वाजताचे, दुसरे साडे दहाचे आणि पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरीता साडे बारा वाजताचे तिसरे सत्र आहे. बुधवारी वाहतूक कोंडीमुळे दुसऱ्या सत्रासाठी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेलेल्या बसेस परतल्या नाहीत. ठिकठिकाणी बसेस वाहतूक काेंडीत अडकल्या होत्या. या बसेस परतणार कधी आणि तिसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांना घेण्याकरीता जाणार कधी असा प्रश्न प्रशासनासमोर होता. शाळा प्रशासनाने तिसरे सत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. वाहतूक कोंडीमुळे शाळा प्रशासनाला आणि विद्यार्थ्यांना सुट्टी घ्यावी लागली. हे सत्र सुट्टीच्या दिवशी चालविले जाईल असे प्रशासनाने सांगितले. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेवर ही वेळ आली आहे. वाहतूक कोंडीचे कारण सांगत डोंबिवली कल्याणकरांना सल्ला दिला आहे की, विविध कामांमुळे वाहतूक कोंडी होणारच. मात्र कल्याण डोंबिवलीकरांनी बेशिस्त वाहने चालविण्याची गरज नाही.  ट्रॅफिक, आरटीओ, महापालिका यंत्रणा काहीच का करत नाहीत, सगळे आपापल्या विषयांत मश्गुल असतात, सामाजिक बांधिलकी आहे की नाहीविवेक पंडित,संस्थापक, विद्यानिकेतन शाळा. 

टॅग्स :kalyanकल्याण