शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्ता, कचरा समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत कर भरू नका; राजू पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 23:51 IST

कचरा दररोज आणि वे‌ळेवर उचलला जात नाही. बेकायदा टपऱ्या, ढाबे उभे राहत आहेत. कोणीही डेब्रिज टाकत आहे, हे काय चालले आहे, असा सवाल पाटील यांनी करताच केडीएमसीचे रस्ते व स्वच्छता विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. 

डोंबिवली :  पूर्वेतील नांदिवली येथील समर्थनगर परिसरात विविध समस्या आहेत. हा भाग वाळीत टाकल्यासारखा आहे का? नागरिकांनी पक्के रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट, मलनि:सारण योजनेची पूर्तता होत नाही, तोपर्यंत केडीएमसीकडे कर भरू नये, असे आवाहन कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केले.

नांदिवलीतील समर्थनगरमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. त्या परिसराची शुक्रवारी पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून वाट काढताना आबालवृद्धांना प्रचंड त्रास होतो. आमचे आरोग्य धोक्यात येते. परंतु, मनपा प्रशासन मात्र काहीच ऐकत नाही, अशी व्यथा नागरिकांनी मांडली. त्यावेळी रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे, असा सवाल पाटील यांनी मनपा अभियंत्यांना केला. त्यावर निधी मंजूर आहे, पण निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तसेच एकवेळ रस्ता होईल, पण ड्रेनेजचे काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी हवा असून, त्याची तरतूद आयुक्तच करू शकतात, असे उत्तर अभियंत्यांनी दिले. त्यावर याबाबत आपण लवकरच आयुक्तांना भेटणार असल्याचे पाटील म्हणाले.

कचरा दररोज आणि वे‌ळेवर उचलला जात नाही. बेकायदा टपऱ्या, ढाबे उभे राहत आहेत. कोणीही डेब्रिज टाकत आहे, हे काय चालले आहे, असा सवाल पाटील यांनी करताच केडीएमसीचे रस्ते व स्वच्छता विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. दरम्यान, ‘कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास वर्षभर कचरा उचलणार नाही, अशी धमकी मनपा अधिकारी देतात, मग ढाबेवाल्यांचे कसे सगळे चालते’, असा सवाल यावेळी परिसरातील एका महिलेने केला.

‘व्यवसाय करणे झाले कठीण’आम्ही रीतसर परवानगी घेऊन बांधकामे करत असलो तरी रस्ते नाहीत, कचऱ्याची समस्या, पावसाळ्यात साचणारे पाणी, यामुळे घरे खरेदीसाठी गिऱ्हाईक येणार तरी कसे? त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे, अशी व्यथा बांधकाम व्यावसायिकांनी यावेळी मांडली.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील