शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

डोंबिवलीकर खूप प्रेमळ; माझ्या आमदार, खासदारांवरही त्यांचे तेवढेच प्रेम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By अनिकेत घमंडी | Updated: March 22, 2023 17:14 IST

"मुळातच डोंबिवलीकर हे खूप प्रेमळ असून माझ्या आमदार, खासदारांवर देखील त्यांचे तेवढेच प्रेम आहे, मला इथे आलो की आनंद मिळतो."

डोंबिवली - गुढीपाडव्यनिमित्त हिंदूनववर्षं स्वागत यात्रेची संकल्पना सातासमुद्रापार नेणारे डोंबिवली हे शहर असून यंदा या यात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मुळातच डोंबिवलीकर हे खूप प्रेमळ असून माझ्या आमदार, खासदारांवर देखील त्यांचे तेवढेच प्रेम आहे, मला इथे आलो की आनंद मिळतो. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या जल्लोषात सहभागी झाले. 

स्वागतयात्रेला बुधवारी नेहमीप्रमाणे पारंपरिक प्रथेनुसार शुभारंभ झाला, सांस्कृतिक नगरीत ढोल ताशांच्या गजरात पश्चिमेकडून मिरवणूक निघाली आणि त्यानंतर हळूहळू पुढे आली, त्यामध्ये पूर्वेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले, त्यादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील हे देखील यात्रेत सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा देत होते. मंदिरात गेल्यानंतर शिंदे यांनी मान्यवरांसह श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि व्यासपीठावर आले. त्यावेळी त्यांच्या मनोगतात त्यांनी कोणतेही राजकीय भाषण करण्याची ही जागा नाही, वेळ नाही, त्यामुळे त्यावर न बोलता आगामी काळातही अशाच जल्लोषात उत्सव साजरे करूया. 

कोरोना काळात आपण सगळे घरात बसून उत्सव करत होतो. आता मात्र जाहीरपणे ते करायला लागलो आहोत हा सकारात्मक बदल आपल्या सरकारने करून दिला हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे असेही ते म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावर संस्थानाच्या अध्यक्षा अलका मुतालिक, उपाध्यक्ष सुहास आंबेकर, वैद्य विनय वेलणकर, माजी अध्यक्ष राहुल दामले, श्रीपाद कुलकर्णी, प्रविण दुधे, माजी आर्मी ऑफिसर (शिफु) शौर्य भारद्वज , सिनेअभिनेते अंकुश चौधरी, दिगदर्शक केदार शिंदे उपस्थित होते.  

मंदिराच्या सुशोभीकरण विषयात कळसासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ११ लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे दुधे यांनी जाहीर केले, त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या. अलका मुतालिक यांनी प्रास्ताविक केले. 

श्री गणेश मंदिर संस्थान मे महिन्यापासून पुढे शतक महोत्सव साजरे करणार आहे, त्या मंदिराच्या सुशोभीकरण मोहिमेत जेवढे काही मंदिर व्यवस्थापनाला अपेक्षित आहे त्याहीपेक्षा जास्त सहकार्य केले जाईल असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यांच्या मनोगतात रा स्व संघाने हे रोपटे लावले, आता त्याला आकार येत असून त्याचा वटवृक्ष होत आहे. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत, संघाने समाजासाठी दिलेलं प्रत्येक समाजकार्य केवढे मोठे असते, त्यामागचा विचार केवढा मोठा असतो हे यानिमित्ताने सिद्ध झाले. संघाच्या विचारांवर चिरंतन वाटचाल करून जो हिंदु हित की बात करेगा वही देश पे राज करे गा... असा नारा देऊन भारत माता की जय च्या घोषणा देऊन चव्हाण यांनी भाषणाचा समारोप केला.  

 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेgudhi padwaगुढीपाडवा