शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण अधिकारी गिरीश बने यांची दबंगगिरी - भाजपचा आरोप

By अनिकेत घमंडी | Updated: April 13, 2024 18:51 IST

नियंत्रण नसल्याने शहरात वाहतूक कोंडी अधिकारी म्हणतात नियमबाह्य कारवाईलाच विरोध 

 डोंबिवली: शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा कारभार पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी हातात घेतल्यापासून रिक्षा चालकांना विनाकारण त्रास देण्याचे काम बने करत असल्याचा आरोप भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी केला.

त्याबाबत शनिवारी त्यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. ते म्हणाले की, बने हे एसी गाडीतून खाली उतरत नाहीत,आणि त्यांच्या गाडीच्या समोर एखादा रिक्षा चालक किंवा रिक्षा समोर आली तर त्या रिक्षा चालकाला गाडीतूनच फोटो काढून दंड मारण्याचे प्रकार ते करत आहेत. मालेकर यांच्या म्हणण्यानुसार शरद शिवाजी वाघ व अनिकेत ठाकूर या रिक्षा चालकांना त्याचा फटका बसला आहे.

मुळात बने यांनी डोंबिवली शहराची भौगोलिक परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्याद्वारे कारवाई करावी. तसेच राज्य शासनाने मुक्त परवाना धोरण सोडल्यामुळे भरमसाठ रिक्षा रोडवर आल्या, त्याचे नियोजन डोंबिवली वाहतूक शाखा कल्याण आरटीओ त्याचबरोबर महापालिकेने करणे गरजेचे होते ही त्यांची जबाबदारी आहे पण त्या यंत्रणा जबाबदारी ढकलत असल्याचे माळेकर म्हणाले.

शहरात अनेक ठिकाणी वाहतूक समस्या आहेत. कर्मचारी वेळेवर ड्युटीवर येत नाही त्यामुळे शहरात प्रत्येक चौका, चौकामध्ये वाहतूक कोंडी होते, त्याकडे लक्ष देण्याचे सोडून बने साहेब फक्त कारवाईच्या पाठी लागले आहेत आम्ही पॉईंटला कर्मचाऱ्यांची मागणी केली असता मनुष्यबळ कमी आहे असे सांगितले जाते. पण मनुष्यबळ दुसऱ्याच ठिकाणी व्यस्त असतात ते योग्य नाही अशी टीकाही त्यांनी केली. त्यासाठी सर्व यंत्रणानी एकत्र येऊन आधी नियोजन करावे, आम्ही रिक्षा लावायच्या कुठे हे त्यांनी सांगावे ? आणि नंतरच त्यांनी रिक्षा चालकांवर कारवाई करावी.

अधिकारी गाडीतूनच रिक्षा चालकांना पहिले ५०० आणि नंतरची १५०० रुपयांचा दंड अशी फोटोशूट करून फाईन मारत आहेत. त्यांच्या दबंगिरीला रिक्षाचालक कंटाळले असून रिक्षा चालकांनी तक्रारी रिक्षा संघटनेकडे केल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली शहरासाठी दक्ष असा कर्मचारी डोंबिवली शहराला द्यावा, मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्रासातून रिक्षा चालकांची सुटका करावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. 

मुळात फ्रंट सीट घेणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे, ती सुरू राहणार. माळेकर म्हणतात कारवाई करू नका तर तसे होणार नाही. नियम, शिस्त लावण्याचा तो प्रयत्न आहे. आता फलक लावून त्याबाबत जनजागृती देखील करण्यात येणार आहे : गिरीश बने, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, डोंबिवली.