शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान

By सचिन सागरे | Updated: May 4, 2024 16:38 IST

Kalyan-Dombivali News: जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

- सचिन सागरेडोंबिवली - जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

कल्याण अंबरनाथ मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रोफाईन रीसायकलिंग प्रा. लि. कंपनीतर्फे ई-कचरा संकलन अभियान पूर्वेकडील कामा कार्यालय येथे शनिवार आणि रविवार रोजी राबविण्यात आले आहे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रा. लिमिटेड ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अधिकृत कंपनी आहे. यावेळी, कामाचे चेअरमन देवेन सोनी, प्रेसिडेंट राजू बेलूर, वाईस प्रेसिडेंट दिपक विश्वनाथ, सेक्रेटरी अमोल येवले तसेच इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रा. लि. च्या फाउंडर वैशाली स्वरूप आणि रिजनल हेड आकाश देशमुख आदी उपस्थित होते.

भारत सरकारने या ई-कचऱ्यासंदर्भात काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. त्यामध्ये ई-कचरा शास्त्रीय पद्धतीने रिसायकल करणे, त्याची योग्य पद्धतीने आणि योग्य कंपनीतर्फे विल्हेवाट लावणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे नमूद केले आहे. आपल्याकडे जेवढे काही रिसायकल होते त्यातील बराच भाग अनधिकृतरित्या काम करणाऱ्या लोकांकडून चुकीच्या पद्धतीने रिसायकल केला जातो. त्यामुळे वातावरणात बरेच विषारी वायू जात आहेत. बराच कचरा हा पाण्यात जाऊन आपले जलस्त्रोत दूषित होत आहेत. या ई-कचऱ्यात असणाऱ्या हानिकारक पदार्थांमुळे जमीन नापीक होत असल्याची माहिती वैशाली स्वरूप यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे