शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान

By सचिन सागरे | Updated: May 4, 2024 16:38 IST

Kalyan-Dombivali News: जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

- सचिन सागरेडोंबिवली - जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

कल्याण अंबरनाथ मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रोफाईन रीसायकलिंग प्रा. लि. कंपनीतर्फे ई-कचरा संकलन अभियान पूर्वेकडील कामा कार्यालय येथे शनिवार आणि रविवार रोजी राबविण्यात आले आहे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रा. लिमिटेड ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अधिकृत कंपनी आहे. यावेळी, कामाचे चेअरमन देवेन सोनी, प्रेसिडेंट राजू बेलूर, वाईस प्रेसिडेंट दिपक विश्वनाथ, सेक्रेटरी अमोल येवले तसेच इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रा. लि. च्या फाउंडर वैशाली स्वरूप आणि रिजनल हेड आकाश देशमुख आदी उपस्थित होते.

भारत सरकारने या ई-कचऱ्यासंदर्भात काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. त्यामध्ये ई-कचरा शास्त्रीय पद्धतीने रिसायकल करणे, त्याची योग्य पद्धतीने आणि योग्य कंपनीतर्फे विल्हेवाट लावणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे नमूद केले आहे. आपल्याकडे जेवढे काही रिसायकल होते त्यातील बराच भाग अनधिकृतरित्या काम करणाऱ्या लोकांकडून चुकीच्या पद्धतीने रिसायकल केला जातो. त्यामुळे वातावरणात बरेच विषारी वायू जात आहेत. बराच कचरा हा पाण्यात जाऊन आपले जलस्त्रोत दूषित होत आहेत. या ई-कचऱ्यात असणाऱ्या हानिकारक पदार्थांमुळे जमीन नापीक होत असल्याची माहिती वैशाली स्वरूप यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे