शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

नव्या पत्रीपुलाचा उतार धोकादायक, डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनचालकांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 23:57 IST

Kalyan : नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते.

कल्याण : बहुचर्चित नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागल्याने वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका झाली असताना आता नव्यानेच एक समस्या उभी राहिली आहे. या पुलावरील कल्याणच्या दिशेने जाणारा रस्ता उताराचा असल्याने त्यावरून जाताना दुचाकी घसरण्याच्या तसेच अन्य वाहनाला धडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, तर दुसरीकडे लगतच्या पुलावरील डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे तसेच उंच-सखल भाग असल्याने तेथून जाताना वाहनचालकांना कसरतीचा सामना करावा लागत आहे.नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे पत्रीपुलाचे काम पूर्ण व्हायला दोन वर्षांहून अधिक कालावधी लागला. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष घातल्याने २५ जानेवारीला त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन  करण्यात आले. नव्या पुलाचे आई तिसाई देवी असे नामकरणही केले असून, तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांची कोंडीतून मुक्तता झाली आहे. ही बाब समाधानाची असली तरी कल्याण बाजूकडील उतारावर वाहने वेगाने जात असल्याने अपघाताच्या घटना त्याठिकाणी घडू लागल्या आहेत. उताराच्या ठिकाणी गोविंदवाडी बायपास येथूनही वाहने पत्रीपूल आणि कल्याणच्या दिशेने जात असल्याने त्या चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्याबाबतचे पत्र मनसेचे कल्याण शहर संघटक रूपेश भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना २९ जानेवारीला दिले आहे. परंतु, अद्याप त्यांच्या पत्राला कोणतेही उत्तर प्रशासनाकडून दिले गेलेले नाही. अशातच आता दुचाकींना अपघात होण्याचे प्रकार वाढत असून, हे प्रकार जीवघेणे असल्याने याची दखल तरी प्रशासनाकडून घेतली जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली