शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मुरबाड शहापूर MMRDA मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

By पंकज पाटील | Updated: January 9, 2024 19:25 IST

संपूर्ण मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारा तालुका म्हणजे मुरबाड शहापूर

बदलापूर : मुरबाड आणि शहापूर हे दोन्ही तालुके मुंबई - ठाण्याला लागून असल्याने या दोन्ही तालुक्यांचा विकास व्हावा यासाठी त्याचा समावेश एम एम आर डी ए क्षेत्रमध्ये करावा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे.         

संपूर्ण मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारा तालुका म्हणजे मुरबाड शहापूर. ह्या दोन्ही तालुक्यांमुळेच खऱ्या अर्थाने मुंबई आणि ठाणे यांचा विकास झाला आहे. मात्र हे दोन्ही तालुके खऱ्या अर्थाने विकसित व्हावे यासाठी त्याचा समावेश एमएमआरडीए क्षेत्रामध्ये करावा अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून आमदार किसन कथोरे करीत होते. त्याच अनुषंगाने सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या दोन्ही तालुक्यांचा समावेश एमएमआरडीए रिजनमध्ये करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 

शहापूर तालुक्यात असलेल्या तानसा, वैतरणा आणि भातसा या तीन प्रमुख धरणांमुळेच संपूर्ण मुंबई शहराची ताण भागवली जात आहे. त्यातच आता ठाणे शहराला देखील याच धरणातून पाणीपुरवठा होत आहे. 

मुरबाड तालुक्यातील बारवी धरणातून देखील ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून मुरबाड तालुका हा ठाणे जिल्ह्यासाठी प्रभावी आहे. 

शहापूर आणि मुरबाड हे दोन्ही तालुके मुंबई आणि ठाणे शहराची तहान भागवणारे तालुके आहेत. मात्र हे दोन्ही तालुके विकासापासून काहीसे लांब असल्यामुळे आता या दोन्ही तालुक्यांचा विकास व्हावा यासाठी एमएमआरडीएमध्ये त्याचा समावेश करावा ही मागणी रास्त मानली जात आहे. 

एम एम आर डी ए क्षेत्रांमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाचा समावेश करण्यात आला आहे. आता शहापूर आणि मुरबाड हे दोन्ही तालुके देखील शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. 

एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये या दोन्ही तालुक्यांचा समावेश झाल्यास हे दोन्ही तालुके मुंबई आणि ठाण्याशी सहज जोडले जाऊ शकतात. तसेच विकास कामांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. 

''मुरबाड आणि शहापूरच्या पाण्यावर मुंबई आणि ठाणे शहराचा विकास होत असेल तर या दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी देखील मुंबईने हातभार लावणे गरजेचे आहे. - किसन कथोरे, आमदार- मुरबाड विधानसभा

टॅग्स :badlapurबदलापूर