शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कल्याण ते दिल्ली सायकलिंग, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

By मुरलीधर भवार | Updated: November 26, 2022 14:32 IST

कल्याण-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणात एक अनोखा उपक्रम राबविल्याचे दिसून आले.

कल्याण-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणात एक अनोखा उपक्रम राबविल्याचे दिसून आले. बाईकपोर्ट सायकल ग्रुपच्या माध्यमातून कल्याण ते दिल्ली अशा सायकल प्रवासाला आजपासून प्रारंभ झाला. या उपक्रमातून आतापर्यंत तब्बल साडे सात लाखांचा मदतनिधी जमा झाला आहे.

ठाणे जिल्ह्याचा शहरी भाग वगळता इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त गुण आहेत. मात्र शिक्षणाच्या मर्यादित संधींमूळे इच्छा असूनही शिक्षणात ही मुलं पुढे येऊ शकत नाही. नेमका हाच धागा पकडून बाईकपोर्ट सायकल ग्रुपने यंदा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. आणि बघता बघता या सामाजिक उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या शिष्यवृत्तीसाठी साडे सात लाखांचा निधी जमा झाला असून येत्या काही दिवसांत त्यात अजून वाढ होण्याचा विश्वास या ग्रुपने व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील ५०१ हुशार आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती सहभागी सायकलिस्ट डॉ. रेहनुमा यांनी दिली.

दरम्यान आज कल्याणातील दुर्गाडी चौकापासून सुरू झालेला १८ जणांचा हा कल्याण ते दिल्ली सायकल प्रवास पुढील आठवडाभर चालणार आहे. दररोज दोनशे किलोमीटरचे अंतर कापण्याचा प्रयत्न हे सायकलपटू करणार आहेत. २ डिसेंबर रोजी म्हणजेच सातव्या दिवशी दिल्लीतील इंडिया गेट येथे या सायकल उपक्रमाचा समारोप होणार असल्याची माहिती सहभागी पोलिस अधिकारी नितीन सुर्यवंशी यांनी दिली.

अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, बीएनआय संघटनेचे संदीप शहा, कल्याण रोटरी क्लबचे डॉ. सुश्रुत वैद्य, कैलास देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखविण्यात आला. गेल्या वर्षी दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव मिळण्यासाठी या सायकल ग्रुपने कल्याण ते गोवा असा प्रवास केला होता.