शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कल्याण ते दिल्ली सायकलिंग, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

By मुरलीधर भवार | Updated: November 26, 2022 14:32 IST

कल्याण-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणात एक अनोखा उपक्रम राबविल्याचे दिसून आले.

कल्याण-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणात एक अनोखा उपक्रम राबविल्याचे दिसून आले. बाईकपोर्ट सायकल ग्रुपच्या माध्यमातून कल्याण ते दिल्ली अशा सायकल प्रवासाला आजपासून प्रारंभ झाला. या उपक्रमातून आतापर्यंत तब्बल साडे सात लाखांचा मदतनिधी जमा झाला आहे.

ठाणे जिल्ह्याचा शहरी भाग वगळता इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त गुण आहेत. मात्र शिक्षणाच्या मर्यादित संधींमूळे इच्छा असूनही शिक्षणात ही मुलं पुढे येऊ शकत नाही. नेमका हाच धागा पकडून बाईकपोर्ट सायकल ग्रुपने यंदा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. आणि बघता बघता या सामाजिक उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या शिष्यवृत्तीसाठी साडे सात लाखांचा निधी जमा झाला असून येत्या काही दिवसांत त्यात अजून वाढ होण्याचा विश्वास या ग्रुपने व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील ५०१ हुशार आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती सहभागी सायकलिस्ट डॉ. रेहनुमा यांनी दिली.

दरम्यान आज कल्याणातील दुर्गाडी चौकापासून सुरू झालेला १८ जणांचा हा कल्याण ते दिल्ली सायकल प्रवास पुढील आठवडाभर चालणार आहे. दररोज दोनशे किलोमीटरचे अंतर कापण्याचा प्रयत्न हे सायकलपटू करणार आहेत. २ डिसेंबर रोजी म्हणजेच सातव्या दिवशी दिल्लीतील इंडिया गेट येथे या सायकल उपक्रमाचा समारोप होणार असल्याची माहिती सहभागी पोलिस अधिकारी नितीन सुर्यवंशी यांनी दिली.

अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, बीएनआय संघटनेचे संदीप शहा, कल्याण रोटरी क्लबचे डॉ. सुश्रुत वैद्य, कैलास देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखविण्यात आला. गेल्या वर्षी दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव मिळण्यासाठी या सायकल ग्रुपने कल्याण ते गोवा असा प्रवास केला होता.