शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्त्यावरील खड्डे मोजून दाखवा अन् ५१ हजार रुपये मिळवा; कल्याणमध्ये राष्ट्रवादीची घोषणा

By मुरलीधर भवार | Updated: September 29, 2023 13:27 IST

राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखविल्यास ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल असे घोषित केले आहे.

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरीक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाला सर्व राजकीय पक्ष टिकेचे लक्ष करीत आहे. राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखविल्यास ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल असे घोषित केले आहे.

कार्याध्यक्ष आव्हाड यांनी काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शहरातील काही रस्त्यांची पाहणी केली. ढोल ताशांच्या गजरात त्यांनी नागरीकांना आवाहन केले की, जो कोणी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखवेल त्याला ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल. दुसरे पारितोषिक ४१ हजार आणि तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपयांचे दिले जाणार आहे. आव्हाड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ठाणे जिल्हयातील आहे. खासदार  श्रीकांत शिंदे हे दोन वेळा खासदार आहे. त्यांच्या लोकसभा मतदार संघात कल्याण पूर्व भाग येतो. 

तसेच कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधान मतदार संघातून तीन वेळी निवडून आले आहेत. तरी देखील कल्याण पूर्वेचा विकास झाला नाही. कल्याण पूर्वेला सावत्र वागणूक दिली जात आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. कल्याण पूर्वेचा विकास करावा असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, कल्याण पूर्वेतील एका विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात भाजप आमदार गायकवाड यांना रस्त्यावरील खड्डयांवर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितेल की, खड्डे बुजविण्यचे आश्वासन सर्वच लोक देत आहे. 

रस्त्यात खडडे, की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. जे लोक टेंडर घेतात. ती पद्धत बंद झाली पाहिजे. कचरा, रस्त्यावरील खड्डे याचा नागरीकांना नेहमीच त्रास होतो. अनेक रस्ते नवे तयार करुन देखील त्याठिकाणी खड्डे पडले आहे. खड्यांमुळे नागरीकांना मानेचा आणि कंबरेचा त्रास होऊन नागरीकांना आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे टेंडर प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे असे सांगत रस्त्यांच्या खड्ड्यांचे खापर टेंडर प्रक्रियेवर फोडले होते. 

टॅग्स :kalyanकल्याण