शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Updated: January 8, 2023 20:08 IST

पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

कल्याण: पिडब्ल्यू खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार आता पूर्ण थांबला असलयाचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. कल्याणमधील रामभाऊ कापसे व्याख्यानमालेच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी ही माहिती दिली. अन्न नागरी पुरवठा विभागातील भ्रष्टचार देखील थांबवून पारदर्शकता करण्यासाठी मोठी आव्हानात्मक निर्णय घेण्यात येत असून सामान्य नागरिकाला धान्य मिळेल यासाठी गरीब कल्याण योजना राबवण्यात येत आहे.

कोरोना काळात ही योजना सुरू झाली, आतापर्यंत ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले, सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळायला हवा ही भावना या  शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. दिवाळीच्या याच योजनेतून ७ कोटी नागरिकांना धान्य देण्यात आले. सामान्य माणसाला लागणाऱ्या आवश्यक त्या योजना या सरकारद्वारे करण्यात येत आहेत.

आगामी काळात आर्थिकदृष्ट्या योजना तयार करणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे मोठं आव्हान आहे. सरकारी नोकऱ्या या सामान्य नागरिकांना कशा।मिळणार यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ७५ हजार नोकऱ्या देण्याचे नियोजन करण्यात येत असून पोलीस दल, बँका आदी सर्व ठिकाणी नोकऱ्या।देण्यात येणार आहेत. तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपलं सरकार आहे, हे सरकार जनसामान्यांचे सरकार आहे हे विचारात घ्यायला हवं, या सरकारने भरपूर वेगळे काम।केले असून विदर्भात अनुशेष भरून काढायला लावला.

कोकणात वेगळ्या पद्धतीने प्राधिकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, एमएमआरडीएच्या माध्यमातून खुंटलेला विकास पूर्ण  मार्गी लावण्यात आला. सबका साथ सबका विकास यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अविरत कार्यरत आहेत, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्मयोगी म्हणून कार्यरत आहेत, चला त्यांच्या पाठिशी आपण ऊभे राहूया. 

त्यावेळी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार, माजी आमदार नरेंद्र पवार, सुभेदार वाडा कट्ट्याचे आनंद कापसे, दीपक।जोशी, आमोद काटदरे, माजी नगरसेवक वरुण पाटील, कोनगावच्या सरपंच रेखा पाटील, पद्माकर कुलकर्णी, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

शत प्रतिशत भाजपपंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

टॅग्स :kalyanकल्याण