शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

coronavirus: बाहेरगावच्या प्रवाशांनी वाढवली चिंता, खाजगी बस आणि टॅक्सीने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 01:57 IST

coronavirus in KDMC :

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण हे रेल्वेचे जंक्शन आहे. तसेच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्रस्थान आहे. त्यामुळे शहरात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे बाहेरगावाहून येणारी प्रवासीसंख्या जास्त आहे. साहजिकच, बाहेरगावाहून येणाऱ्यांमुळे शहरात कोरोना पसरण्याची दाट शक्यता आहे. रेल्वेचे जंक्शन आणि कल्याण एसटी डेपो ही प्रमुख सार्वजनिक प्रवासी स्थानके असली, तरी शहरात खाजगी टॅक्सी वाहतूक, बस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. खाजगी बसगाड्या अंतर्गत जिल्ह्यासह अन्य राज्यांतून प्रवास करतात. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत टिटवाळा, आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कोपर, अप्पर कोपर, ठाकुर्ली, दिवा-पनवेल मार्गावरील दातिवली, निळजे ही रेल्वेस्थानके येतात. या रेल्वे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी त्याचबरोबर डोंबिवली बसस्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांची एकूण संख्या लाखोंच्या घरात आहे. कल्याण रेल्वे आणि बस डेपोत प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात असली, तरी खाजगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात नाही. त्याचबरोबर चेकनाके आणि शहराच्या हद्दीवर कोरोना चाचणी केली जात नाही.  बाहेरगावांतून येणाऱ्यांची चाचणी मोजक्याच जागी कल्याण रेल्वेस्थानक व कल्याण बस डेपो येथे बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते.  मात्र, दिवा-वसई आणि दिवा-पनवेल मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. तसेच विठ्ठलवाडी बस डेपो आणि डोंबिवली बसस्थानकात कोरोना चाचणी केली जात नाही.   शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील आणि अन्य राज्यांतून शेतमाल  घेऊन येणारे टेम्पो, ट्रकचालक व शेतमाल विक्रेते शेतकरी यांची कोरोना चाचणी केली जात नाही. रस्ते वाहतुकीद्वारे शहरात अनेक एण्ट्री पॉइंट आहेत. त्याठिकाणी चाचणी केली जात नाही.  कल्याण रेल्वेस्थानक आणि बस डेपोत बाहेरगावांतून आलेल्या प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर घेऊन कोरोना चाचणी केली जाते. मात्र, त्यापैकी किती प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होते, याचा तपशील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्या गावातून कल्याण-डोंबिवलीत कोरोना दाखल होतो, हे सुस्पष्ट नाही.  रेल्वेकल्याण रेल्वेस्थानकात तीन शिफ्टमध्ये कोरोना चाचणी केंद्र चालविले जाते. त्याठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये २०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. एकूण ६०० प्रवाशांची कोरोना चाचणी तीन शिफ्टमध्ये केली जाते. बाहेरगावच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता चाचणीचे प्रमाण व्यस्त आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांद्वारे दिवसाला तीन लाख प्रवासी प्रवास करतात.  बस डेपोकल्याण बस डेपोमध्ये सकाळी १० ते  दुपारी १ वाजताच्या दरम्यान प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. अन्य वेळेत कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे त्या वेळेत परगावांहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. चार तासांत केवळ १०० प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. दिवसाला १० हजार प्रवासी डेपोतून प्रवास करतात.  ट्रॅव्हल्स शहरातून खाजगी बस चालवल्या जातात. राज्यात व राज्याबाहेर या बस चालतात. त्यातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. टॅक्सी कॅब चालतात. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही कोरोना चाचणी केली जात नाही. यामुळे नेमके रुग्ण किती आहेत याचा अंदाज प्रशासनाला बांधता येत नाही अशी माहिती यावेळी संबंधितांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली