शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

भंगार बेवारस वाहन कारवाईला कोरोनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:08 IST

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीतील विशेष मोहिमेत २८२ वाहने केली जप्त

- प्रशांत मानेकल्याण: रस्ते अडवून अनेक महिने ठाण मांडलेल्या बेवारस आणि भंगार अवस्थेतील वाहनांविरोधात केडीएमसीने शहर आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली होती. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत राबविलेल्या मोहिमेत मोठ्या संख्येने वाहने जप्त केली आहेत. परंतु, सद्यस्थितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने या मोहिमेला पुरती खीळ बसली आहे. मागे जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असून या संदर्भातले परिपत्रक नुकतेच वाहतूक शाखेने जाहीर केले आहे.रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी व्हावी, लोकांना प्रवास करणे सुलभ जावे या दृष्टिकोनातून रस्त्यालगत आणि रस्त्यावर उभी असलेली आणि शहर सौंदर्यीकरणात बाधा आणणारी बेवारस आणि भंगार स्थितीतील वाहने उचलून ती अन्य ठिकाणी एकत्रितपणे जमा करण्याची मोहीम केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सुरू केली होती. २५ नोव्हेंबरपासून तिला प्रारंभ झाला. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत २८२ वाहने जप्त करण्याची कारवाई प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी केली. केडीएमसीला शहर आणि वाहतूक पोलिसांचेही सहकार्य लाभले. डोंबिवलीतील फ, ग, ह आणि ई प्रभाग क्षेत्रांतर्गत केलेल्या कारवाईत जप्त केलेली वाहने मनपाच्या खंबाळपाडा येथील वाहनतळावर तर कल्याणमधील अ, ब, क, ड, आय, जे या प्रभाग क्षेत्रात जप्त केलेली वाहने वसंत व्हॅली येथील डेपोमध्ये ठेवली आहेत. या बेवारस आणि भंगार वाहनांमध्ये दुचाकी, चारचाकी, हातगाड्या, स्टिल वाहतूक हातगाड्या, थ्री व्हीलर टेम्पो यांचा समावेश आहे. हायड्रा आणि डम्परच्या सहाय्याने ही कारवाई केली गेली. दरम्यान फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना संक्रमणाचा उद्रेक सुरू झाल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यात मनपा यंत्रणा व्यस्त झाली आहे. त्यामुळे तेव्हापासून या मोहिमेला ब्रेक लागला आहे. यामुळे वाहने कधी उचलली जाणार हा खरा प्रश्न आहे.नागरिकांच्या प्रतिक्रियाबेवारस आणि धूळखात भंगार अवस्थेत पडलेल्या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच त्याचबरोबर या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात कचरा साचला जात असल्याने अस्वच्छता दिसून येते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. त्यामुळे एकप्रकारे महापालिकेकडून शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानालाही कुठेतरी बाधा पोहोचते त्यामुळे शहरात अधूनमधून त्यासंदर्भात कारवाई होणे गरजेचे आहे     - समिता कदम, कल्याण (पश्चिम)कल्याण डोंबिवलीतील बहुतांश रस्ते हे अरुंद आहेत. केडीएमसीने मध्यंतरी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी भंगार अवस्थेतील वाहने जप्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात ही मोहीम बंद असली तरी पुन्हा रस्त्यांवर अशी वाहने धूळखात पडून कोंडी होणार नाही याची दक्षता महापालिकेसह वाहतूक पोलिसांनीही घ्यावी.    - स्वप्निल सावंत, डोंबिवली,पूर्वकोरोनामुळे सद्यस्थितीला बंद असलेली मोहीम पुन्हा केव्हा सुरू होईल याची खात्री नाही. पण वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या आणि अनेक महिने रस्त्यात जागा अडवून पादचाऱ्यांनाही अडथळा ठरणाऱ्या भंगार आणि बेवारस वाहनांवर कारवाई ही सुरू राहिलीच पाहिजे. या सततच्या कारवाईमुळे निश्चितच सुधारणा होईल यात शंका नाही.    - राकेश जाधव, डोंबिवली पश्चिम१६ वाहनांचा होणार लिलावडोंबिवलीच्या हद्दीत सार्वजनिक रोडवर बेवारस स्थितीत धूळखात एकूण १६ वाहने मिळून आली. ती ज्यांची आहेत त्यांनी घेऊन जाण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले होते. परंतु, वाहने सोडवण्यास कोणी आले नाही. संबंधित वाहने उन, वारा, पाऊस व हवेतील प्रदूषणामुळे गंजून व सडून पूर्णपणे निकामी झालेली आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांचा लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव शुक्रवारी १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता खंबाळपाडा आगारात होणार आहे. लिलावामध्ये ज्या व्यावसायिकांना भाग घ्यावयाचा आहे त्यांना त्यांचेकडील परवाना व संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन केले आहे.    - उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक     डोंबिवली शाखा