शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

भंगार बेवारस वाहन कारवाईला कोरोनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:08 IST

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीतील विशेष मोहिमेत २८२ वाहने केली जप्त

- प्रशांत मानेकल्याण: रस्ते अडवून अनेक महिने ठाण मांडलेल्या बेवारस आणि भंगार अवस्थेतील वाहनांविरोधात केडीएमसीने शहर आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली होती. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत राबविलेल्या मोहिमेत मोठ्या संख्येने वाहने जप्त केली आहेत. परंतु, सद्यस्थितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने या मोहिमेला पुरती खीळ बसली आहे. मागे जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असून या संदर्भातले परिपत्रक नुकतेच वाहतूक शाखेने जाहीर केले आहे.रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी व्हावी, लोकांना प्रवास करणे सुलभ जावे या दृष्टिकोनातून रस्त्यालगत आणि रस्त्यावर उभी असलेली आणि शहर सौंदर्यीकरणात बाधा आणणारी बेवारस आणि भंगार स्थितीतील वाहने उचलून ती अन्य ठिकाणी एकत्रितपणे जमा करण्याची मोहीम केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सुरू केली होती. २५ नोव्हेंबरपासून तिला प्रारंभ झाला. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत २८२ वाहने जप्त करण्याची कारवाई प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी केली. केडीएमसीला शहर आणि वाहतूक पोलिसांचेही सहकार्य लाभले. डोंबिवलीतील फ, ग, ह आणि ई प्रभाग क्षेत्रांतर्गत केलेल्या कारवाईत जप्त केलेली वाहने मनपाच्या खंबाळपाडा येथील वाहनतळावर तर कल्याणमधील अ, ब, क, ड, आय, जे या प्रभाग क्षेत्रात जप्त केलेली वाहने वसंत व्हॅली येथील डेपोमध्ये ठेवली आहेत. या बेवारस आणि भंगार वाहनांमध्ये दुचाकी, चारचाकी, हातगाड्या, स्टिल वाहतूक हातगाड्या, थ्री व्हीलर टेम्पो यांचा समावेश आहे. हायड्रा आणि डम्परच्या सहाय्याने ही कारवाई केली गेली. दरम्यान फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना संक्रमणाचा उद्रेक सुरू झाल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यात मनपा यंत्रणा व्यस्त झाली आहे. त्यामुळे तेव्हापासून या मोहिमेला ब्रेक लागला आहे. यामुळे वाहने कधी उचलली जाणार हा खरा प्रश्न आहे.नागरिकांच्या प्रतिक्रियाबेवारस आणि धूळखात भंगार अवस्थेत पडलेल्या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच त्याचबरोबर या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात कचरा साचला जात असल्याने अस्वच्छता दिसून येते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. त्यामुळे एकप्रकारे महापालिकेकडून शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानालाही कुठेतरी बाधा पोहोचते त्यामुळे शहरात अधूनमधून त्यासंदर्भात कारवाई होणे गरजेचे आहे     - समिता कदम, कल्याण (पश्चिम)कल्याण डोंबिवलीतील बहुतांश रस्ते हे अरुंद आहेत. केडीएमसीने मध्यंतरी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी भंगार अवस्थेतील वाहने जप्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात ही मोहीम बंद असली तरी पुन्हा रस्त्यांवर अशी वाहने धूळखात पडून कोंडी होणार नाही याची दक्षता महापालिकेसह वाहतूक पोलिसांनीही घ्यावी.    - स्वप्निल सावंत, डोंबिवली,पूर्वकोरोनामुळे सद्यस्थितीला बंद असलेली मोहीम पुन्हा केव्हा सुरू होईल याची खात्री नाही. पण वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या आणि अनेक महिने रस्त्यात जागा अडवून पादचाऱ्यांनाही अडथळा ठरणाऱ्या भंगार आणि बेवारस वाहनांवर कारवाई ही सुरू राहिलीच पाहिजे. या सततच्या कारवाईमुळे निश्चितच सुधारणा होईल यात शंका नाही.    - राकेश जाधव, डोंबिवली पश्चिम१६ वाहनांचा होणार लिलावडोंबिवलीच्या हद्दीत सार्वजनिक रोडवर बेवारस स्थितीत धूळखात एकूण १६ वाहने मिळून आली. ती ज्यांची आहेत त्यांनी घेऊन जाण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले होते. परंतु, वाहने सोडवण्यास कोणी आले नाही. संबंधित वाहने उन, वारा, पाऊस व हवेतील प्रदूषणामुळे गंजून व सडून पूर्णपणे निकामी झालेली आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांचा लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव शुक्रवारी १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता खंबाळपाडा आगारात होणार आहे. लिलावामध्ये ज्या व्यावसायिकांना भाग घ्यावयाचा आहे त्यांना त्यांचेकडील परवाना व संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन केले आहे.    - उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक     डोंबिवली शाखा