शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

कोरोनामुळे नागरिकांनी ऑनलाइन कामे करावी, केडीएमसी आयुक्तांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 05:52 IST

महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये या ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता हे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. अत्यावश्यक कामकाज या आदेशातून वगळण्यात आले आहे.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच महापालिका मुख्यालय किंवा अन्य प्रभाग कार्यालयांत यावे. अन्यथा ऑनलाइन, ई-मेल आणि मोबाइलचा वापर करून महापालिकेशी संबंधित कामे  करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी काढले आहेत. महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये या ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता हे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. अत्यावश्यक कामकाज या आदेशातून वगळण्यात आले आहे. अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांना काही अत्यावश्यक काम असल्यास त्यांनी प्रथम मोबाइलवरून संपर्क साधावा. त्यानंतरच प्रभाग अधिकारी कार्यालयात भेटीसाठी यावे. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे की नाही, याची जबाबदारी सुरक्षारक्षक आणि अधिकारी वर्गाची राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याविरोधात सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.नागरिकांनी महापालिकेच्या वेबसाइटवर संबंधित अधिकारी आणि विभागास ई-मेल करावा. अत्यंत तातडीचे टपाल आणि मेसेज ई-मेलद्वारे पाठविले जावेत. महापालिका मुख्यालयात दैनंदिन टपाल आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सिस्टीम मॅनेजर यांनी नागरी सुविधा केंद्रात टपाल स्वीकारण्याची सुविधा करावी. नागरिकांचा भेटीचा दिवस तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. महापालिकेचा कर आणि अन्य देय रकमा भरण्यासाठी नागरिकांनी डिजिटल सेवेचा वापर करावा. महापालिका कार्यालयात होणाऱ्या बैठका अत्यावश्यक असतील तर त्या आयोजित कराव्यात. अशा बैठकांना महापालिकाबाहेरील अधिकारी, कर्मचारी, खासगी व्यक्तीना आमंत्रित करण्यात येऊ नये, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाonlineऑनलाइन