शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उल्हासनगरातील डम्पिंग हटवासाठी काँग्रेसचे उपोषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 19:18 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाच संपली आहे.

उल्हासनगर : खडी खदान डम्पिंग ग्राऊंडमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने, डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाने नेताजी चौकात बुधवार पासून आमरण उपोषण सुरू केले. महापालिकेकडून ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला उन्हाळा व हिवाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात डम्पिंगची दुर्गंधी पसरते. याप्रकाराने डम्पिंग परिसरातील शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना खाज, त्वचा रोग, दमा, टीबी आदी रोगाची लागण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. डम्पिंग हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे लावून धरली असून त्यासाठी रस्ता रोखो, उपोषण, धरणे आंदोलन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली. आतातर डम्पिंगची काय स्थिती आहे, ते कुठे व केंव्हा हटविणार याबाबत महापालिका प्रशासन काहीएक बोलत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.

 शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याबाबत काहीएक निर्णय महापालिका घेत नसल्याने, अखेर रोहित साळवे यांनी नेताजी चौकात सहकाऱ्यांसह बुधवारी आमरण उपोषणाचा सुरू केले. डम्पिंग हटविण्याची प्रक्रिया सुरू करणे, ज्याठिकाणी डम्पिंग हटविले जाणार. तेथिल परिस्थिती काय? पावसाळ्यात डम्पिंग मधून प्रचंड दुर्गंधी येते. त्यावर काही उपाययोजना केली का? असा प्रश्न साळवे यांनी यावेळी केला. तसेच प्रसिद्ध शिवमंदिर, सिंधी समाजाचे चालिया मंदिर डम्पिंग ग्राऊंड पासून अवघे १ की.मी. परिसरात येत असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर