शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विश्वनाथ भोईर हे खरे लोकप्रतिनिधी, त्यांचे अभिनंदन; राजू पाटील असं का म्हणाले?, पाहा

By मुरलीधर भवार | Updated: October 18, 2023 16:52 IST

आमदारांनी दुर्गाडी ते पत्रीपूलाच्या दरम्यान रस्त्यावरील खड्डे भरण्याची सूचना केली.

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर एव्हढे अधिकारी आले आहेत. मात्र शहरातील रस्त्यावर खड्डे, वाहतूक कोंडीचा प्रश्न, कचरा उचलला जात नाही. या विविध समस्या सुटत नाहीत. हे जेव्हा माझ्या सहनशक्तीच्या पलिककडे होईल, तेव्हा मला काय करायचे ते मी करणार असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.आमदार भोईर यांच्या या विधानानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आमदार भोईर सारखे लाेकप्रतिनिधी सत्तेत असूनही देखील खरे बोलतात. त्यामुळे त्यांचे अभिनंदन. ते खरे लाेकप्रतिनिधी आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध समस्याबाबत केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणची घेटे सोबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार भोईर यांनी काल बैठक घेतली. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जे काय करावे लागेल ते करा असे अधिकाऱ्यांना बजावले. आमदारांनी दुर्गाडी ते पत्रीपूलाच्या दरम्यान रस्त्यावरील खड्डे भरण्याची सूचना केली. हे रस्ते कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येतात. ते न पाहता महापालिकेने खड्डे बुजविले पाहिजेत. वारंवार आयुक्तांना सांगून देखील कामे का होत नाहीत असा प्रश्न आमदारांना विचारला असता त्यांनी सांगितले की, प्रतिनियुक्तीवर बरेच अधिकारी आलेले आहे. स्टाफ सर्व भरलेला आहे. तरी देखील कामे होताना दिसून येत नाही. कल्याणच्या पब्लीकला याचे कोडे पडले आहे. तसेच मलाही कोडे पडले आहे. हे कोडे आपल्याला सोडवायचे आहे. एव्हढे अधिकारी असताना कल्याणमध्ये कुठे तरी बकालपणा सुरु आहे.

रस्ते, स्वच्छता या सोयी सुविधा नागरीकांना का देऊ शकत नाही. ज्या वेळेस माझ्यापण सहनशक्तीच्या पलिकडे होईल त्यावेळी मी काय करायचे आहे ते करणार. याबाबत आमदार पाटील यांनी सांगितले की, भोईर यांच्या मताशी मी सहमत आहे. एका बाबतीत मी त्याचे अभिनंदन करेन. सत्तेधारी पक्षात असाता देखील त्यांनी ही व्यथा मांडली. जे खरे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी असे स्पष्टच बोलायला पाहिजे. वरवरची विकास कामे तुम्हाला दिसतात. ती लाेकांपर्यंत पोहचलेली नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे. चांगली कामे काय आहे या शहरात तुम्ही दाखवा. खड्डे, रस्ते,ट्राफिकचा बोजवारा, भ्रष्टाचार चांग्लया गोष्टी आहेत कुठे जोपर्यंत ही लोक ठाण मांडून बसली आहेत. तोपर्यंत हे असे चालणार.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली