शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कल्याण लोकसभा मतदार संघातील नावे डिलीट झाल्यासंदर्भात उच्च न्यायालयात तक्रार

By अनिकेत घमंडी | Updated: May 28, 2024 19:29 IST

याचिका फाईल करण्यासाठी काही गोष्टींची माहिती अधिकारामार्फत मागविण्यात आलेली आहे,

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदार संघातील मतदारांची नावे डिलीट झाल्याप्रकरणी डोंबिवलीमधील वकील चिन्मय पागे यांनी दक्ष नागरिक अक्षय फाटक यांच्या माध्यमातून सोमवारी त्या संदर्भात न्याय मागणारी तक्रार उच्च न्यायालयात देण्यात आलेली आहे. याचिका फाईल करण्यासाठी काही गोष्टींची माहिती अधिकारामार्फत मागविण्यात आलेली आहे, परंतु त्याला वेळ लागणार असल्याने आपण सर्व मतदारांच्या वतीने उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांना तातडीने एक पत्र दिलेले असून त्यात तीन प्रमुख मागण्या केल्याचे सांगण्यात आले. त्यात परस्पर वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा यादीत घ्यावी आणि भविष्यात अशाप्रकारे नावे डिलीट करण्यात येऊ नयेत. 

या प्रकरणाची साखोल चौकशी करवी आणि दोषींवर सक्त कारवाई करावी. बीएलओ, बीआरओ आणि इआरओ या पदावरच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. ही नावे मुद्दाम वगळण्यात आलेली नाहीत ना? याबाबतही चौकशी करण्यात यावी. तसेच, ज्या मतदारांना आयोगाच्या चुकीमुळे मतदान करता आले नाही. त्यांना दिनांक १ जूनच्या आत मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, या मागण्या केल्या आहेत. २० मे रोजी कल्याण लोकसभा मतदार संघात निवडणूक पार पडली. त्या दिवशी हजारो मतदारांना आपली नवे परस्पर डिलीट झाली असल्याचे समजले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नावे डिलीट झाली असल्याचे लक्षात येताच फाटक यांनी एक गुगल फॉर्म बनवून अशा सर्व मतदारांना त्यांची माहिती त्या फॉर्म वर भरून देण्याचे आवाहन करणारी पोस्ट पाठवली. 

जी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्याला आतापर्यंत तब्बल २२८० हून अधिक मतदारांनी त्यात आपली माहिती दिलेली आहे. या प्रकरणावर अधिक माहिती गोळा केली असता अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याचे फाटक म्हणाले, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ११ ऑगस्ट २०२३ रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने सर्व राज्यांच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसर्स ना एक पत्र पाठवली होती. ज्यात नावे वगळण्यासाठी आवश्यक ती पद्धत (एसओपी) नमूद करण्यात आलेली आहे. त्यात स्पष्टपणे असे म्हणलेले आहे, इ ज्या मतदारांचे नाव वगळायचे असेल, मग ते कोणत्याही कारणाने असुदे, फोटो नसेल, पत्ता बदलला असेल, किंवा मृत असेल तर त्या व्यक्तीला एक पत्र स्पीड पोस्ट ने पाठवून १५ दिवसांचा अवधी द्यायला हवा. जर ते पत्र परत आले, अथवा त्याला उत्तर आले नाही तरच ते नाव वगळण्याच्या यादीत टाकावे. 

त्यासाठी आयोगाने पत्राचे प्रारूपही दिले आहे. मात्र असे असतानाही कल्याण लोकसभा मतदार संघातील हजारो मतदारांची नावे वगळताना , तसे करण्याआधी कोणत्याही प्रकारचे पत्र आयोगाकडून पाठविण्यात आलेले नाही. ही हजारो नावे परस्पर डिलीट करण्यात आलेली असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे नक्की कोणत्या कारणांनी ही नावे वगळण्यात आली याचे उत्तर आयोगाने द्यायला हवे. ज्या मतदारांची नावे डिलीट झाली आहेत त्यांनी अयोगाच्या ११ ओगस्ट २०२३ रोजीच्या पत्राचा संदर्भ देऊन माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज करावा असे आवाहन फाटक यांनी।केले आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCourtन्यायालय