शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण: डोंबिवलीमधील १५६ कारखाने स्थलांतरी करण्याचा निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:49 IST

या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कल्याण- डोंबिवलीतील रासायनिक, अतिधोकादायक, धोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळात आज घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये. त्याची अंमलबजावणीही केली जावी अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे या ठिकाणचे नागरीक त्रस्त आहेत. डोंबिवलीत प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला आहे. रस्ता गुलाबी झाला आहे. तसेच रासायनिक कंपन्यांत स्फोट झाला आहे. प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर एका कंपनीला भीषण आग लागली होती. २०११ पासून आजर्पयत घडलेल्या घटनांमध्ये ३० जणांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्य़ा घटनांच्या पाश्र्वभूमीवर अतिधोकायक आणि धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्यात यावेत. जे नागरी वस्तीला लागून आहेत असा मुद्दा समोर आला होता. एमआयडीसीच्या संचालक मंडळाने आज कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतल्याने जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी त्याचे स्वागत केले आहे. घेतलेला निर्णय केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी केली जावी याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.

प्रदूषणामुळे डोंबिवली एमआयडीसीतील एक रस्ता गुलाबी झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाहणीकरीता आले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. त्यानंतर अग्नीशमन दल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक सव्रेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फेब्रुवारी ते मार्च २०२० मध्ये ३०२ कारखान्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होते.३८ कारखान्यांमध्ये अनियमीतता आणि त्रूटी आढळून आल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना प्रादूर्भाव सुरु झाल्याने पुढील कारवाईस ब्रेक लागला होता. आत्ता १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय त्याच सव्रेक्षणाच्या आधारे घेण्यात आला असावा असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी