शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कल्याण: डोंबिवलीमधील १५६ कारखाने स्थलांतरी करण्याचा निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:49 IST

या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कल्याण- डोंबिवलीतील रासायनिक, अतिधोकादायक, धोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळात आज घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये. त्याची अंमलबजावणीही केली जावी अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे या ठिकाणचे नागरीक त्रस्त आहेत. डोंबिवलीत प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला आहे. रस्ता गुलाबी झाला आहे. तसेच रासायनिक कंपन्यांत स्फोट झाला आहे. प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर एका कंपनीला भीषण आग लागली होती. २०११ पासून आजर्पयत घडलेल्या घटनांमध्ये ३० जणांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्य़ा घटनांच्या पाश्र्वभूमीवर अतिधोकायक आणि धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्यात यावेत. जे नागरी वस्तीला लागून आहेत असा मुद्दा समोर आला होता. एमआयडीसीच्या संचालक मंडळाने आज कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतल्याने जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी त्याचे स्वागत केले आहे. घेतलेला निर्णय केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी केली जावी याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.

प्रदूषणामुळे डोंबिवली एमआयडीसीतील एक रस्ता गुलाबी झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाहणीकरीता आले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. त्यानंतर अग्नीशमन दल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक सव्रेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फेब्रुवारी ते मार्च २०२० मध्ये ३०२ कारखान्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होते.३८ कारखान्यांमध्ये अनियमीतता आणि त्रूटी आढळून आल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना प्रादूर्भाव सुरु झाल्याने पुढील कारवाईस ब्रेक लागला होता. आत्ता १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय त्याच सव्रेक्षणाच्या आधारे घेण्यात आला असावा असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी