शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण: डोंबिवलीमधील १५६ कारखाने स्थलांतरी करण्याचा निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:49 IST

या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कल्याण- डोंबिवलीतील रासायनिक, अतिधोकादायक, धोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळात आज घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये. त्याची अंमलबजावणीही केली जावी अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे या ठिकाणचे नागरीक त्रस्त आहेत. डोंबिवलीत प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला आहे. रस्ता गुलाबी झाला आहे. तसेच रासायनिक कंपन्यांत स्फोट झाला आहे. प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर एका कंपनीला भीषण आग लागली होती. २०११ पासून आजर्पयत घडलेल्या घटनांमध्ये ३० जणांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्य़ा घटनांच्या पाश्र्वभूमीवर अतिधोकायक आणि धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्यात यावेत. जे नागरी वस्तीला लागून आहेत असा मुद्दा समोर आला होता. एमआयडीसीच्या संचालक मंडळाने आज कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतल्याने जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी त्याचे स्वागत केले आहे. घेतलेला निर्णय केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी केली जावी याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.

प्रदूषणामुळे डोंबिवली एमआयडीसीतील एक रस्ता गुलाबी झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाहणीकरीता आले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. त्यानंतर अग्नीशमन दल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक सव्रेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फेब्रुवारी ते मार्च २०२० मध्ये ३०२ कारखान्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होते.३८ कारखान्यांमध्ये अनियमीतता आणि त्रूटी आढळून आल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना प्रादूर्भाव सुरु झाल्याने पुढील कारवाईस ब्रेक लागला होता. आत्ता १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय त्याच सव्रेक्षणाच्या आधारे घेण्यात आला असावा असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी