शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कल्याण: डोंबिवलीमधील १५६ कारखाने स्थलांतरी करण्याचा निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:49 IST

या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कल्याण- डोंबिवलीतील रासायनिक, अतिधोकादायक, धोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळात आज घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये. त्याची अंमलबजावणीही केली जावी अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.

डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे या ठिकाणचे नागरीक त्रस्त आहेत. डोंबिवलीत प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला आहे. रस्ता गुलाबी झाला आहे. तसेच रासायनिक कंपन्यांत स्फोट झाला आहे. प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर एका कंपनीला भीषण आग लागली होती. २०११ पासून आजर्पयत घडलेल्या घटनांमध्ये ३० जणांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्य़ा घटनांच्या पाश्र्वभूमीवर अतिधोकायक आणि धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्यात यावेत. जे नागरी वस्तीला लागून आहेत असा मुद्दा समोर आला होता. एमआयडीसीच्या संचालक मंडळाने आज कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतल्याने जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी त्याचे स्वागत केले आहे. घेतलेला निर्णय केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी केली जावी याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.

प्रदूषणामुळे डोंबिवली एमआयडीसीतील एक रस्ता गुलाबी झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाहणीकरीता आले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. त्यानंतर अग्नीशमन दल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक सव्रेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फेब्रुवारी ते मार्च २०२० मध्ये ३०२ कारखान्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होते.३८ कारखान्यांमध्ये अनियमीतता आणि त्रूटी आढळून आल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना प्रादूर्भाव सुरु झाल्याने पुढील कारवाईस ब्रेक लागला होता. आत्ता १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय त्याच सव्रेक्षणाच्या आधारे घेण्यात आला असावा असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी