शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समस्येने त्रस्त नागरिकांची केडीएमसी मुख्यालयात धाव

By मुरलीधर भवार | Updated: June 12, 2023 20:10 IST

मुख्यालयात धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

कल्याण : जून उजाडून १२ दिवस झाले तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यातच पाणी येत नसल्याने कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा, ठाणकरपाडा परिसरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहेत. नळाला पाणीच येत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना उपशहरप्रमुख मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

बेतूरकरपाडा परिसरातील साईबाबानगर परिसरातील साईराज सोसायटी, ठाणकर पाडा परिसरातील औदुंबर आळी येथील शिवप्रेरणा मित्रमंडळ यासह इतर परिसरातील नागरिकांच्या घरी पाणी येत नसून पाणी आले तरी दूषित पाणीपुरवठा होत आहे. पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नसल्याने अखेर येथील महिला वर्ग आणि इतर नागरिकांनी पालिका मुख्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन या नागरिकांना दिले. दोनच दिवसांपूर्वी उगले यांनी पाणीपुरवठा अभियंत्याच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतरही समस्या सुटलेली नाही.

टॅग्स :kalyanकल्याणwater shortageपाणीकपात