शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पाणी समस्येने त्रस्त नागरिकांची केडीएमसी मुख्यालयात धाव

By मुरलीधर भवार | Updated: June 12, 2023 20:10 IST

मुख्यालयात धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

कल्याण : जून उजाडून १२ दिवस झाले तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यातच पाणी येत नसल्याने कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा, ठाणकरपाडा परिसरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहेत. नळाला पाणीच येत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना उपशहरप्रमुख मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

बेतूरकरपाडा परिसरातील साईबाबानगर परिसरातील साईराज सोसायटी, ठाणकर पाडा परिसरातील औदुंबर आळी येथील शिवप्रेरणा मित्रमंडळ यासह इतर परिसरातील नागरिकांच्या घरी पाणी येत नसून पाणी आले तरी दूषित पाणीपुरवठा होत आहे. पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नसल्याने अखेर येथील महिला वर्ग आणि इतर नागरिकांनी पालिका मुख्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन या नागरिकांना दिले. दोनच दिवसांपूर्वी उगले यांनी पाणीपुरवठा अभियंत्याच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतरही समस्या सुटलेली नाही.

टॅग्स :kalyanकल्याणwater shortageपाणीकपात