शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबरच काम करण्याचीही मानसिकता: डॉ. भाऊसाहेब दांगडे

By सचिन सागरे | Updated: August 20, 2023 15:55 IST

सध्या वातावरणात बदल होत आहेत त्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ही निर्माण होत आहे.

कल्याण : सध्या वातावरणात बदल होत आहेत त्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ही निर्माण होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हा एकच मार्ग आहे. कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबर काम करण्याची मानसिकता ही दिसून येते. प्रशासन व नागरिक एकत्र आल्यास निश्चितपणे परिस्थिती बदलू शकते असे कौतुकोद्गार आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी वृक्षारोपण प्रसंगी काढले.

आंबिवली रिंगरोडवर राबवण्यात आलेल्या ग्रीन स्माईल उपक्रमाच्या माध्यमातून कल्याणकरांनी नविन इतिहास घडवला. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच, केडीएमसी आणि एका खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीसाठी पहिल्यांदाच शहरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य नागरिक एकत्र आले. 

रिंगरोडच्या टिटवाळा आंबिवली भागात आज सकाळी ग्रीन स्माईल उपक्रम राबवण्यात आला. या रिंगरोडवर दोन किलोमीटरपर्यंत दोन्ही भागांत वेगवेगळ्या देशी प्रजातीच्या झाडांची रोपे लावण्यात आली. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था आणि पाच वर्षांच्या चिमुरडीपासून ते ९० वर्षांच्या आजीबाईंपर्यंत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

कल्याणकरांनी ही सर्व झाडे स्वखर्चातून लावली असून ती जगविण्यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक झाडाची देखभाल करण्यासाठी आयएमए, कल्याणने विशेष संस्था नियुक्त केली आहे. तर आज ज्या व्यक्तींनी झाडे लावली त्यांच्या नावाचे बोर्ड त्या झाडांवर लावण्यात आले आहेत. 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकता मानव वृक्ष, डॉ. आनंदी गोपाळ यांच्या नावाचा, कोविडशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून आणि देश रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांप्रति कृतज्ञता म्हणून एक अशा पाच मानाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. 

यावेळी केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कल्याण संस्कृती मंच अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सचिव श्रीराम देशपांडे, खजिनदार अतुल फडके, रौप्य महोत्सवी गुढीपाडवा स्वागत यात्रेचे समन्वयक डॉ. प्रशांत पाटील,  हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याण अध्यक्षा डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर, सचिव विकास सुरंजे, डॉ अश्विन कक्कर, डॉ. राजेश राजू, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. नितीन चिटणीस, डॉ. भाग्यश्री मोघे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.