शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 15:13 IST

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत  नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे.

- मयुरी चव्हाण

कल्याणकल्याणडोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत  नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे उद्याच्या भरवशावर अवलंबून न राहता आपल्याला आजच लस मिळावी या प्रयत्नात नागरिक आहेत. लसीचा साठा उपलब्ध झाल्याचा मेसेज केडीएमसीकडून मिळताच नागरिक टोकन घेण्यासाठी मध्य रात्रीपासूनच लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. केवळ आपल्याला लस मिळावी म्हणून तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही दिवस रात्र करून  लसीकरण केंद्राबाहेर बसत आहेत. त्यातच  नागरिक जास्त येत असल्याने टोकनही कमी पडू लागले आहेत. रात्री रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना  टोकन मिळत आहेत मात्र सकाळी  सहा ते सात वाजण्याच्या सुमारास  लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या नागरीकांना पुन्हा घरी जावे लागत असल्याचे चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी शाब्दिक चकमकीचे प्रकारही वाढले आहेत. 

बेड, ऑक्सिजन, औषध यासाठी करावी लागणारी धावपळ आता लसीकरणावर येऊन  ठेपली आहे. सुरवातीला लसीकरणावरून नाकं मुरडनारे नागरिक आता लसीसाठी जंग जंग  दिसत आहेत. नागरिकांना जास्त वेळ बसून  ठेवण्यापेक्षा टोकन देऊन त्या त्या वेळेनुसार  लसीकरण करण्याकडे काही  केंद्रांचा कल दिसतो. गेल्या  दोन आठवड्यात लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे.लस उपलब्ध होईल की नाही याचा सध्या काही भरवसा नसल्याने  नागरिक टोकनसाठी रात्रीपासून रांगा लावत आहेत.

डोंबिवलीतील  शिवमंदिर जवळील असलेल्या शाळेतील लसीकरण  केंद्रावर सोमवारी  टोकनमूळे काही काळ  गोंधळ उडाला होता. या ठिकाणी काही नागरिक रात्री एक वाजल्यापासून रांग लावून उभे होते. त्यामुळे सकाळी टोकन घ्यायला आलेल्या नागरिकांना पुन्हा घरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन दिले गेल्याचा आरोप काही नागरीकांना केला. तसेच टोकन नेमकं देतात तरी कधी? असा सवालही   उपस्थित केला आहे.मात्र टोकन सकाळी 6 ते 7 या वेळेतच दिले जाते असे  सेना पदाधिकारी सागर जेधे यांनी सांगितले . 

टोकन वाटपाची एक वेळ ठेवणं निश्चित आहे. काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन वाटले गेले. सकाळी  सात वाजताच टोकन  संपल्याचा बोर्ड लावण्यात आला. त्यामुळे काहींना घरी जावे लागले. 

- सचिन गवळी , नागरिक 

आम्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांना नेहमी मदत करतो. मात्र जेव्हा जेव्हा लस उपलब्ध होते तेव्हा सकाळी 6 ते 7 या  वेळेतच  टोकन वाटले जाते. अलीकडे लससाठा कमी असल्याने लस मिळते की नाही?या विवंचनेत नागरिक रात्रीपासूनच टोकन साठी रांगा लावत आहेत.

-सागर जेधे, शिवसेना पदाधिकारी.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका