शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

"नागरिकांना पाच दिवस पाणी मिळत नाही"; मंत्री रविंद्र चव्हाण संतापले...

By मुरलीधर भवार | Updated: September 26, 2022 21:33 IST

डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

डोंबिवली : पाच दिवस नागरीकांना पाणी मिळत नाही. केडीएमसीने टँकरही बंद केले. हे ऐकून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केडीएमसीचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. अधिकाऱ्यांवर प्रशासनाच्या प्रमुखाचा धाक राहिला नाही. लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी टंचाईची समस्या दूर करणार असे आश्वासन त्यांनी नागरीकांना दिले आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी धारेवर धरले होते. रखडलेल्या विविध विकास कामांसंदर्भात भाजप नेत्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभार पाहून भाजप नेते संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांना नागरीकांची कामे करण्याची ताकीद दिली गेली. आज डोंबिवली पूर्व भागातील दावडी परिसरातील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि स्थानिक नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. 

जालिंदर पाटील यांनी सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून दावडी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पाच पाच दिवस पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलावर्गाला वणवण फिरावे लागते. आम्ही मंत्री चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. ही समस्या सोडविली पाहिजे. नागरीकांची ही समस्या ऐकून मंत्री चव्हाण हे संतप्त झाले. या संदर्भात वेळोवेळी सांगितले गेले आहे. महापालिकेचे नियोजन ढासळले आहे. प्रशासन प्रमुखाचा अधिकारी वर्गावर धाक नाही. मंत्री चव्हाण यांनी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांचाच उल्लेख केला. मात्र त्यांचा नामोल्लेख करणो टाळले. यासंदर्भात  लवकरात लवकर अमृत पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली