शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

"नागरिकांना पाच दिवस पाणी मिळत नाही"; मंत्री रविंद्र चव्हाण संतापले...

By मुरलीधर भवार | Updated: September 26, 2022 21:33 IST

डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

डोंबिवली : पाच दिवस नागरीकांना पाणी मिळत नाही. केडीएमसीने टँकरही बंद केले. हे ऐकून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केडीएमसीचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. अधिकाऱ्यांवर प्रशासनाच्या प्रमुखाचा धाक राहिला नाही. लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी टंचाईची समस्या दूर करणार असे आश्वासन त्यांनी नागरीकांना दिले आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी धारेवर धरले होते. रखडलेल्या विविध विकास कामांसंदर्भात भाजप नेत्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभार पाहून भाजप नेते संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांना नागरीकांची कामे करण्याची ताकीद दिली गेली. आज डोंबिवली पूर्व भागातील दावडी परिसरातील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि स्थानिक नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. 

जालिंदर पाटील यांनी सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून दावडी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पाच पाच दिवस पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलावर्गाला वणवण फिरावे लागते. आम्ही मंत्री चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. ही समस्या सोडविली पाहिजे. नागरीकांची ही समस्या ऐकून मंत्री चव्हाण हे संतप्त झाले. या संदर्भात वेळोवेळी सांगितले गेले आहे. महापालिकेचे नियोजन ढासळले आहे. प्रशासन प्रमुखाचा अधिकारी वर्गावर धाक नाही. मंत्री चव्हाण यांनी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांचाच उल्लेख केला. मात्र त्यांचा नामोल्लेख करणो टाळले. यासंदर्भात  लवकरात लवकर अमृत पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली