शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

"नागरिकांना पाच दिवस पाणी मिळत नाही"; मंत्री रविंद्र चव्हाण संतापले...

By मुरलीधर भवार | Updated: September 26, 2022 21:33 IST

डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

डोंबिवली : पाच दिवस नागरीकांना पाणी मिळत नाही. केडीएमसीने टँकरही बंद केले. हे ऐकून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केडीएमसीचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. अधिकाऱ्यांवर प्रशासनाच्या प्रमुखाचा धाक राहिला नाही. लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी टंचाईची समस्या दूर करणार असे आश्वासन त्यांनी नागरीकांना दिले आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी धारेवर धरले होते. रखडलेल्या विविध विकास कामांसंदर्भात भाजप नेत्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभार पाहून भाजप नेते संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांना नागरीकांची कामे करण्याची ताकीद दिली गेली. आज डोंबिवली पूर्व भागातील दावडी परिसरातील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि स्थानिक नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. 

जालिंदर पाटील यांनी सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून दावडी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पाच पाच दिवस पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलावर्गाला वणवण फिरावे लागते. आम्ही मंत्री चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. ही समस्या सोडविली पाहिजे. नागरीकांची ही समस्या ऐकून मंत्री चव्हाण हे संतप्त झाले. या संदर्भात वेळोवेळी सांगितले गेले आहे. महापालिकेचे नियोजन ढासळले आहे. प्रशासन प्रमुखाचा अधिकारी वर्गावर धाक नाही. मंत्री चव्हाण यांनी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांचाच उल्लेख केला. मात्र त्यांचा नामोल्लेख करणो टाळले. यासंदर्भात  लवकरात लवकर अमृत पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली