शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...अन् मुलांनी मोबाइल न वापरण्याचा केला संकल्प; दाऊदी बोहरा समाजाचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:05 IST

१५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी

डोंबिवली : डिजिटल युगात मोबाइल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहान मुलांच्या बाबतीत मोबाइलचा वापर चिंतेचा विषय ठरला आहे. यामुळे दाऊदी बोहरा समाजाने मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. मुलांनी मोबाइल न वापरण्याचा संकल्प केला आहे. अमाकीन मोहम्मदीया सोसायटीमध्ये २८०० दाऊदी बोहरा समाजाचे रहिवासी राहतात. त्यामध्ये सुमारे ३५० मुले-मुली १५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांनी डोंबिवलीतील जमाली सभागृह, सालेह सभागृह, इजी सभागृह आणि मुबारका शाळा येथे मुलांना एकत्र करत मोबाइलमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. आपल्या वडीलधाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या मुलांनी मोबाइल न वापरण्याचा संकल्प केला.

उपस्थित विद्यार्थ्यांनी काय सांगितले? 

मोबाइलच्या वापरामुळे माझी झोप पूर्ण होत नव्हती. माझे डोळे खराब होण्याची शक्यता होती. शारीरिक हालचाल होत नव्हती. वडिलधाऱ्यांनी मोबाइलचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर यापुढे मोबाइलवर वेळ घालविण्यापेक्षा मैदानी खेळासाठी वेळ देईन, असे १३ वर्षीय फातिमाने सांगितले.

मोबाइलच्या वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष है होत होते. मोबाइलचा वापर बंद केल्याने मला आता अभ्यासासाठी वेळ मिळत आहे. डोकेदुखीचा त्रासही कमी झाल्याचे आठवीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले. 

मोबाइलचा वापर बंद केल्यापासून मला रात्री शांतपणे झोप लागत आहे. मोबाइल वापरण्याचे सोडल्यापासून टिकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याकडे कल वाढल्याचे विद्यार्थ्यांन सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMobileमोबाइल