शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कल्याणमध्ये रेल्वेचा सिग्नल बिघाड; लाखो प्रवाशांना मनस्ताप, रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब

By अनिकेत घमंडी | Updated: July 22, 2024 10:39 IST

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब

डोंबिवली: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरू होती, त्यामुळे सोमवारी सकाळपासून प्रवाशांना दिलासा मिळाला होता. तेवढ्यात सकाळी ८ वाजेदरम्यान कल्याण स्थानकात सिग्नल फेल झाल्याने लोकल वाहतुकीचा बोजा उडाला. त्यामुळे पावसात चालली पण सिग्नलमध्ये अडकली अशी स्थिती लोकल प्रवाशांची झाली.

पाऊण तास लोकल नसल्याने काहींनी कोपर, ठाकुर्ली स्थानक रेल्वे रुळातून चालून गाठले आणि त्याचा फटका कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. प्रवाशांचे सगळया नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले. सकाळपासून दहा मिनिटे विलंबाने सुरू असलेली लोकल सिग्नल गोंधळामुळे विस्कळीत झाली. जलद, धीम्या सर्व मार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. मध्य रेल्वे याबाबत उद्घोषणा यंत्राद्वारे माहिती देत नसल्याने नेमका गोंधळ कुठे आणि काय झाला होता याची माहिती प्रवाशांना मिळू शकली नाही. त्यामुळे प्रवाशाना अडचणीला सामोरे जावे लागले.

कल्याण मध्ये बिघाड झाल्याने त्या स्थानकासह डोंबिवली, दिवा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा मार्गावर आदी सर्वत्र प्रवाशांची तोबा गर्दी झाल्याने सगळा गोंधळ उडाला होता. त्यात लांबपल्याच्या गाड्यांची देखील वाहतूक विस्कळीत झाल्याने त्या गाड्यांनी ठिकठिकाणी जाणारे प्रवासी ठाणे, कल्याण स्थानकात अडकले होते.

एरव्ही सकाळी ९ वाजेदरम्यान डोंबिवली स्थानकात कल्याण सीएसएमटी ही एसी जलद लोकल या सिग्नल।गोंधळामुळे तासभर लेट आल्याने त्या गाडीने जाणाऱ्या शेकडो महिलांचे हाल झाले. स्थानकात उभे रहायला जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी झाल्याने आबालवृद्ध प्रवाशांचे हाल झाले.

सकाळच्या सत्रात ही घटना घडल्याने प्रवासी हैराण झाले होते, काय करावे कोणाला सुचले नाही. काहींनी घरी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला, आठवड्याच्या शुभारंभाला दांडी होण्याचे त्यांना दडपण होते. त्यामुळे रेल्वेच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीlocalलोकलcentral railwayमध्य रेल्वे