शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाकुर्लीत गोरखपूर एक्स्प्रेसच्या ब्रेक लायनरला आग; प्रवाशांमध्ये धाकधूक

By अनिकेत घमंडी | Updated: July 15, 2024 09:38 IST

या घटनेमुळे सकाळच्या पहिल्या सत्रातील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.

अनिकेत घमंडी/ डोंबिवली: एलटीटी गोरखपूर मार्गावर जाणाऱ्या गोरखपूर एक्स्प्रेस गाडीच्या एका डब्याच्या ब्रेक लायनरला आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे ६:३० वाजता ठाकुर्ली स्थानकात घडली. त्या घटनेमुळे प्रवाशांनी घाबरून गाडी थांबताच डब्यातून उतरून स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य दिले, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.मात्र या घटनेमुळे सकाळच्या पहिल्या सत्रातील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेषतः डाऊन जलद मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली होती. घटनेनंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवून गाडी कल्याणच्या दिशेने गेली आणि तेथून पुढे गेल्याची माहिती रेल्वेने दिली. 

अशा पद्धतीने गाडी बंद पडल्यास रेल्वे ट्रॅकमध्ये उतरताना प्रवाशांनी काळजी घ्यायला हवी, कारण कर तसे।केले नाही तर मात्र मोठ्या अपघाताची शक्यता आहे, त्यामुळे एकीकडे सुरक्षितता जपताना दुसरीकडे जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.

शनिवारी अचानक पणे अंबरनाथ बदलापूर मार्गावर अचानक मालगाडी फेल झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.लांबपल्याच्या गाड्यांचा बिघाड हा लोकल।सेवेवर मनस्ताप होऊ।लागला आहे, त्यावर प्रभावी उपाययोजना करून कल्याण यार्डचे रिमॉडेलिंगवर भर देऊन समस्या निकाली काढणे गरजेचे आहे. लांबपल्याच्या गाड्या कल्याण।पुढे आल्या नाहीत तर लोकल सेवेला पूर्ण मोकळीक मिळेल आणि त्यामुळे गतिमान प्रवास अनुभवता येईल असे उपनगरी प्रवाशांचे म्हणणे आहे.

सोमवारच्या गोंधळामुळे उपनगरी लोकल सेवेवर परिणाम।झाला आणि बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने आठवड्याचा प्रवास वेळेत होईल कामावर वेळेत जाता येईल असे प्रवाशांना वाटले होते, मात्र सकाळीच या अपघातामुळे प्रवाशांना गर्दीतच प्रवास करावा लागला.

टॅग्स :kalyanकल्याण