शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान; काँग्रेस नेते माळी यांचा आरोप

By मुरलीधर भवार | Updated: July 23, 2022 20:04 IST

सरकारी उद्योग विकायला काढले आहे. त्यामुळे या संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची संधी बाद झाली आहे. त्याचबरोब शैक्षणिक आरक्षण बाद केले आहे. राजकीय आरक्षणही बाद करण्याचे कट कारस्थान भाजपचे होते, असा आरोप माळी यांनी केला आहे.

कल्याण- आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिअल डेटा तयार केला होता. आज आमचे सरकार नसल्याने त्याचे सगळे श्रेय भाजपा सरकार घेत आहे. ओबीसींचे आरक्षण घालविण्यात भाजपचे कट कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी आज येथे केले.

हिराचंद मुथा कॉलेजच्या वतीने व्हॉट इज ओबीसी? या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश मुथा, प्राचार्य वैशाली गोखले, ठाणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष जयदीप सानप, निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्र तायडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

अध्यक्ष माळी यांनी सांगितले की, आघाडी सरकारने बांठिया आयोजागी स्थापना केली. बांठिया आयोगाने काही जिल्ह्यांत शून्य, १०, १५ आणि २० टक्के आरक्षण सुचविले आहे. त्यांचे हे सर्वेक्षण चुकीचे आहे. त्यात काही त्रूटी आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. या त्रूटी आघाडी सरकारशिवाय अन्य कोणतेही सरकार दूर करु शकत नाही. 

भाजप प्रणित केंद्र सरकारने खाजगी करण केले आहे. सरकारी उद्योग विकायला काढले आहे. त्यामुळे या संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची संधी बाद झाली आहे. त्याचबरोब शैक्षणिक आरक्षण बाद केले आहे. राजकीय आरक्षणही बाद करण्याचे कट कारस्थान भाजपचे होते, असा आरोप माळी यांनी केला आहे. सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानसारखी स्थिती आपल्या देशात उद्भवू शकते, अशी शक्यताही माळी यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीkalyanकल्याणcongressकाँग्रेस