शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आरटीओच्या कारभाराविरोधात डोंबिवलीत भाजप प्रणित रिक्षा संघटना करणार ८ जुलैला रस्ता रोको 

By अनिकेत घमंडी | Updated: July 1, 2024 16:40 IST

भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी याबाबत सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन।करणार असल्याचे जाहीर केले.

डोंबिवली: कल्याण आरटीओच्या मनमानी कारभाराचा फटका सामान्य रिक्षा चालक, वाहनचालकांना बसला असून आरटीओ कार्यालयात कोणतेही काम वेळेवर होत नाही, त्या दिरंगाई विरोधात भाजप प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेसह संलग्न संघटनांनी ८ जुलै, सोमवारी कल्याण शीळ रस्ता रोको करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी याबाबत सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन।करणार असल्याचे जाहीर केले. कल्याण आरटीओच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात एक दिवसीय लक्षणीक उपोषण व रास्ता रोको करणार असल्याचे ते म्हणाले. कल्याण आरटीओचे अधिकारी यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे बऱ्याच वेळा चर्चा केली, रिक्षा चालकांच्या अडचणी समस्या त्यांच्यासमोर वारंवार मांडल्या तरीही रिक्षा चालकांची कामे होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नियमात शासनाची फी भरून सर्व कागदपत्रे सादर केली असता, अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ करण्यात येते.

आधी तीन महिन्यापूर्वी एक अधिकारी असताना रिक्षा चालकांची कामे होत होती,आता एक आरटीओ दोन एआरटीओ असे तीन अधिकारी असतानाही सामान्य वाहनचालक, रिक्षा चालकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे मालेकर म्हणाले. अधिकाऱ्यांना हवे असणारे मलाईदार खाते, त्याची वाटाघाटी विषयांमध्ये सर्वसामान्य नागरिक व रिक्षाचालक भरडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व बाबी वारंवार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील ते जाणून-बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये ८ जुलैरोजी इंदिरा गांधी चौक, डोंबिवली पूर्व येथे एक दिवशीय लक्षणीय उपोषण व कल्याण शीळ रस्ता भागाजी वझे चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

आरटीओ भ्रष्टाचार विरोधात सहा महिन्यात दुसरे आंदोलन : या अगोदरही ३० जानेवारी शहरातील सर्वपक्षीय रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करण्यात आले।होते. आरटीओ कार्यालयात नागरिक व रिक्षा चालकांच्या पिळवणुकीबाबत एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांची व रिक्षा चालकांची कशी लूट कल्याण आरटीओकडून करण्यात येते याचा दर फलक ही लावण्यात आला होता, त्यावेळी अधिकारी बदलणार असून निश्चित फरक पडेल असे आश्वासन देण्यात आले होते, त्यानुसार आरटीओ अधिकारी बदलले परंतु भ्रष्टाचार मात्र कमी।झालेला नाही असे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त।केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली