शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

डोंबिवलीतील २ कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असल्याची भाजपची तक्रार

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2023 17:03 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले नमुने, अहवाल येताच होणार कारवाई

कल्याण- डोंबिवलीतील पियूष आणि जयराज या दोन कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असून त्यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली आणि आैद्योगिक सुरक्षिततेचे पालन केले जात नाही अशी तक्रार कल्याण भाजप उप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कल्याण भाजप उपाध्यक्ष पाटील यांनी या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कल्याम, आैद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालय कल्याण, कामगार आयुक्त या चारही विभागांकडे तक्रार केली आहे. पियूष आणि जयराज या दोन्ही कंपन्या कापड प्रक्रिया उद्याेग प्रकाराती आहे. त्याठीकाणी रासायनिक प्रक्रियेकरीता बा’यलरचा वापर केला जातो. त्याकरीता कोळसा जाळला जातो. तसेच प्रक्रियेपश्चात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेली नियमावलीचे पालन केले जात नाही. तसे कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविली जात नाहीत. कंपनीत १ हजार कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी ३ टक्के कामगारांनाच आरोग्य कामगार विमा आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ दिला जातो. उर्वरीत कामगारांना हा लाभ दिला जात नाही. त्यांना १२ तासापेक्षा जास्त राबवून घेतले जाते. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. या विविध तक्रारींचा पाढाच पाटील यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे.

दरम्यान या तक्रारीची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून संबंधित दोन्ही कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याठिकाणचे प्रक्रिया करण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत. ते प्रयोगशाळेकडे पाठविले गेल आहे. त्यांचा रिपोर्ट येताच पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण