शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

डोंबिवलीतील २ कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असल्याची भाजपची तक्रार

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2023 17:03 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले नमुने, अहवाल येताच होणार कारवाई

कल्याण- डोंबिवलीतील पियूष आणि जयराज या दोन कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असून त्यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली आणि आैद्योगिक सुरक्षिततेचे पालन केले जात नाही अशी तक्रार कल्याण भाजप उप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कल्याण भाजप उपाध्यक्ष पाटील यांनी या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कल्याम, आैद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालय कल्याण, कामगार आयुक्त या चारही विभागांकडे तक्रार केली आहे. पियूष आणि जयराज या दोन्ही कंपन्या कापड प्रक्रिया उद्याेग प्रकाराती आहे. त्याठीकाणी रासायनिक प्रक्रियेकरीता बा’यलरचा वापर केला जातो. त्याकरीता कोळसा जाळला जातो. तसेच प्रक्रियेपश्चात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेली नियमावलीचे पालन केले जात नाही. तसे कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविली जात नाहीत. कंपनीत १ हजार कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी ३ टक्के कामगारांनाच आरोग्य कामगार विमा आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ दिला जातो. उर्वरीत कामगारांना हा लाभ दिला जात नाही. त्यांना १२ तासापेक्षा जास्त राबवून घेतले जाते. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. या विविध तक्रारींचा पाढाच पाटील यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे.

दरम्यान या तक्रारीची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून संबंधित दोन्ही कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याठिकाणचे प्रक्रिया करण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत. ते प्रयोगशाळेकडे पाठविले गेल आहे. त्यांचा रिपोर्ट येताच पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण