शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप

By प्रशांत माने | Updated: October 28, 2022 17:36 IST

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 

डोंबिवलीः  केंद्र सरकारचा महत्वाकांशी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन भूसंपादनात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे कल्याण ग्रामीण चे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. त्यांनी आज  ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भूमिपुत्र शेतकऱ्यांसह भेट घेत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. रस्त्यावरील ताडपत्रीच्या घरांना सरकारकडून १४ लाखांचा मोबदला दिला जातोय,अन स्वतःच्या सातबाऱ्याच्या जागेत घर असलेल्या भूमिपुत्रांना सात लाखांचा मोबदला दिला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेला  बुलेट ट्रेन प्रकल्प हा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून जात आहे. त्यामुळे येथील बहुतांश भूमिपुत्रांच्या जमिनी यात बाधित होत आहेत. मात्र या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय दिला जात असल्याने या संदर्भात शेतकऱ्यांनी  आमदार  पाटील यांची भेट घेत आपली कैफियत मांडली  होती. यावर   पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत ठाण्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. या संदर्भात तातडीने बैठक घेऊन कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 या संदर्भात पाटील म्हणाले कि, जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली त्यावेळेस भूधारकांना चांगला मोबदला मिळेल यावर शेतकरी सरकारला जमीन दयायला तयार आले. अश्या वेळेस एक लॉबी तयार झाली ज्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मोठा घोटाळा इथे केलेला आहे. इथे  जिल्हाधिकाऱ्यांकडे मी स्वतः शेतकऱ्यांना घेऊन आलो होतो तिथे शेतकऱ्यांची स्वतःची जागा आहे. स्वतःच्या चाळी आहेत.आरसीसी स्ट्रक्चर आहेत. त्यांना सहा लाखांच्या आसपास मोबदला दिला जातोय  अन शिळफाट्याला बंगाली बाबाची ताडपत्रीची घर होती. त्यानं सरकारी जागेवर ताडपत्रीची घर बांधली त्यांना १४ लाखांचं मोबदला दिला जातोय. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. खरतर केंद्र सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यांना लवकर करायचा असेल तर त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचे महाराष्ट्रातील जे पाठीराखे आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. याच्यात ज्या प्रमाणे घोळ झाला आहे त्या प्रमाणे एसआयटी स्थापन करून या अधिकाऱ्यांना किंवा दलालांना  उघडे पाडले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो होतो त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते आम्हाला न्यायालयात जायच्या आधी बैठक घेतील. सोमवार किंवा मंगळवारी बैठक होईल तेव्हा बघू काय दिलासा मिळतो का ? नाहीतर आम्ही याच्या विरोधात आंदोलन देखील करू,ज्या व्यासपीठावर न्याय मागायचा आहे तिथे न्याय देखील मागू पण आमच्या भूमिपुत्रांना रस्त्यावर येऊ देणार नाही त्यांना त्यांचा योग्य मोबदला घेऊन देणारच अशी प्रतिक्रिया  पाटील यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसे