शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार म्हाडा इमारतींचा ताबा

By मुरलीधर भवार | Updated: November 4, 2023 17:36 IST

प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही.

कल्याण- राज्य सरकारने गावच्या विकासासाठी राखीव ठवेलेल्या गायरान जमिनीवर म्हाडाने इमारती उभारल्या असून गावच्या आरक्षित जागेवर बांधलेल्या इमारतींचा ताबा ७ नोव्हेंबर रोजी भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार असल्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांनी दिला आहे.

भंडार्ली गोठेघर गाव आणि रजिया मार्केट या आरक्षित जागेवर म्हाडा तर्फे खाजगी विकासकाने ग्रामपंचायत आणि इतर कोणतीही परवानगी न घेता इमारतीचा बांधल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून ही जागा गावच्या विकासासाठी, शाळा बांधण्यासाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी वापरण्याची ग्रामस्थांची मागणी होती. अनेक मोर्चे आंदोलने करून सुद्धा ही जागा मिळत नसल्याने या ग्रामस्थांनी प्रांत, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला.

या प्रकरणी प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. येत्या मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी हे ग्रामस्थ म्हाडाच्या इमारतींचा ताबा घेणार इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण