शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

'कल्याण' आगाराला बाप्पा पावला, गणरायाच्या आगमनालाच ७५ लाखांचे उत्पन्न

By अनिकेत घमंडी | Updated: September 5, 2022 19:24 IST

३०२ बस मधून १३ हजार २८८ प्रवाशांनी घेतला लाभ

अनिकेत घमंडी 

डोंबिवली: दोन वर्षे कोरोनाचा काळ आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप यामुळे लाल परीच्या तोट्यात वाढ झाली होती. आता मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणासह राज्यात अन्यत्र गणेशभक्तांनी जाण्यासाठी कल्याणच्या बस आगारातून आरक्षण करून प्रवास केला, त्यातून राज्य परिवहन महामंडळाला ७५ लाख ५० हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.

यंदाच्या वर्षी ३०२ बसेस गणेशोत्सव काळात सोडण्यात आल्या, त्यात कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लांजा, कुडाळ आदी भागापर्यन्त बसेस सोडण्यात आल्या. प्रति बसमध्ये सरासरी ४४ प्रवासी होते असेही सांगण्यात आले. अशा पद्धतीने गणपतीच्या पहिल्या दिवसापर्यँत १३ हजार २८८ प्रवाशांनी त्या सेवेचा लाभ घेतला. प्रत्येक बस फेरीमागे सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न परिवहनला झाले. ही आकडेवारी केवळ कल्याण बस आगारामधून मिळालेल्या माहितीवरून सांगण्यात आली. गेल्या वर्षी याच मोसमात अवघ्या २०० बस फेऱ्या झाल्या होत्या, त्यात मात्र एवढी प्रवासी संख्या देखील नव्हती. यंदा त्या बस संख्येत १०३ ने वाढ झाली असून आर्थिक उलाढाल व प्रवासी संख्या देखील वाढले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली.

जुलै महिन्यात पाऊस दमदार झाल्याने काही दिवस बसफेर्या रद्द झाल्या होत्या, त्याचा फटका या आगाराला बसला होता. साधारणपणे या आगरातून दिवसाला ३० हजार प्रवासी प्रवास करतात, त्या कालावधीत मात्र प्रवाशांचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी झाले होते, आता मात्र प्रवासी वाढले असून गणेशोत्सवाचा मोसम तेजीत गेला असल्याने परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

टॅग्स :Bus Driverबसचालकkalyanकल्याण