शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:53 IST

कल्याण-शीळ राेडजवळ असलेल्या कोळेगावातील प्रीमियर ग्राऊंडवर रविवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.

कल्याण : १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट केली, कल्याण-शीळ रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा निर्णय लवकर घेऊन त्यांना मोबदला दिला जाणार आहे, बदलापूर- कांजूरमार्ग मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

कल्याण-शीळ राेडजवळ असलेल्या कोळेगावातील प्रीमियर ग्राऊंडवर रविवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शिंदे बाेलत हाेते. पुढे ते म्हणाले,  फेसबुक लाइव्ह करून सरकार चालविता येते नाही. तळागाळात जाऊन काम करावे लागते. शेतात साचलेला चिखल तुडवत पाहणी करावी लागते. घरात बसून ते काम होत नाही. आमचे  सरकार लोकाभिमुख आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून सरकारमधील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी हा लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याआधीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याचे धाडस नव्हते. दिलेला शब्द पाळावा लागतो. दिलेला शब्द पाळण्याचे धाडस आमच्या सरकारने दाखविले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

या कामांचे केले भूमिपूजनमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील सूतिकागृह आणि कर्कराेग रुग्णालय, डोंबिवली पश्चिमेतील फिश मार्केट आणि कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले तेव्हा उपस्थितांनी मोबाइल टॉर्च लावून त्यांचे जोरदार स्वागत केले. 

सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता काळात देशभरातील गरिबी हटवण्याचे काम खऱ्या अर्थाने झाल्याचे या प्रसंगी एकनाथ शिंदे सांगितले.  आधीचे महाविकास आघाडीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे सरकार होते. आमचे सरकार हे सर्वसामन्यांचे अश्रू पुसणारे आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना