शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

खराब कंत्राटदारांचा ठाणे जिल्हयाला शाप : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By प्रशांत माने | Updated: October 1, 2023 14:52 IST

केडीएमसीतर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानासाठी ते कल्याणात आले होते.

कल्याण: केवळ एक नाही तर असे अनेक प्रकल्प आहेत की ज्यावरून खराब कंत्राटदारांचा ठाणे जिल्हयाला शाप असल्याचे स्पष्ट होत असल्याचे उद्विग्न उद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले. केडीएमसीतर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी माध्यमांनी शहरांच्या बकालपणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत केडीएमसी प्रशासनातर्फे दुर्गाडी किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात पाटील हे स्वत: हातात झाडू घेऊन सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा विकास होत असताना तो स्वच्छही असला पाहिजे. मात्र केवळ स्वच्छता पंधरवड्यापुरता हे स्वच्छता अभियान न राबवता दररोज झाले पाहिजे. शहरातील नागरिकांनीही स्वच्छतेची शपथ घेऊन त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला तर राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कल्याण अग्रस्थान पटकावेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

या स्वच्छता अभियानात माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे शहरप्रमूख रवी पाटील भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव यांच्यासह अनेक अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरिकांनी एक दबावगट तयार केला पाहिजे

शहरातील रस्त्यांची कामे असो की स्वच्छतेची की आणखी कोणती. ही कामे चांगली होण्यासाठी नागरिकांनीही एक दबावगट तयार केला पाहिजे. ज्यातून शहरात होणाऱ्या कामांवर लक्ष आणि प्रशासनावर त्याचा अंकुश राहू शकेल. तर शहरातील बकालपणाबाबत आपण महापालिका अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घालणार नसून लवकरच या प्रश्नांबाबत केडीएमसी प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kalyanकल्याणKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील